कोपरगाव तालुका
युवराजांच्या जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून कोपरगाव वकील संघात हंगामा !

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून या निवडणुकीत चार जागांचा अपवाद वगळता सर्व जागा बिनविरोध निवडून आणल्या गेल्या या पार्श्वभुमीवर काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव वकील संघाने कोपरगावचे आ.आशुतोष काळे व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा सत्कार आयोजित केला असताना या सत्कार समारंभात तेथील वकिलांनी घराणेशाहीला आक्षेप घेत दुसऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याना संधी का दिली नाही ? असा रोकडा सवाल करत या तिसऱ्या पिढीतील दोन्ही युवराजांना अडचणीत टाकले असून त्यांची बोलती बंद केली असल्याने या घटनेत वकील संघात दोन तट पडल्याचे उघड झाल्याने या घटनेचे जिल्ह्यात सर्वत्र चर्वितचर्वण सुरु आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत अड्.दिलीप लासुरे व अड्.बी.बी.कडू यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.तर वकील संघाचे अध्यक्ष अड्.शिरिषकुमार लोहकणे यांनी सूचक मौन पाळले आहे.या घटनेची जिल्ह्यातील चौकाचौकात सर्वत्र चर्चा सुरु आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा जोर संपल्यानंतर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.त्यात अहमदनगरमध्येही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुराळा उडुन ती धूळ अद्याप खाली बसलेली नाही.या निवडणुकीत १७ जागा बिनविरोध संपन्न झाल्या असून त्यातील सेवा सोसायटी मतदार संघातील नगर,पारनेर,कर्जत तर बिगरशेती संस्था मतदार संघात एक अशा ०४ जागांसाठी जिल्हा बँकेची निवडणूक संपन्न झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली होती.भाजपने प्रथमच पक्ष म्हणून यात लक्ष घालण्याचे ठरविल्याने महाविकास आघाडीनेही जोर लावला.निवडणूकित २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या.चार जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली.त्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ९,भाजप ७,काँग्रेस ४ आणि शिवसेना १ असे उमेदवार निवडून आले आहेत.यामध्ये भाजपचे सात दिसत असले तरी त्यातील विखे यांच्या सोबत असलेले केवळ दोघेच आहेत.थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चौघांना यश आले आहे.जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने शिवसेनेचा जिल्हा बँकेत प्रवेश झाला आहे.शेवटी भाजपच्याच नाराजांना फोडून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले.आता निवडणूक संपली असून आता या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळे विविध ठिकाणी समर्थक आयोजित करत आहे.असाच सोहळा व जुन्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या जुन्या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर साधारण २८ लाख रुपये खर्चून नवीन तात्पुरत्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून त्याची पाहणी व नूतन जिल्हा बँकेच्या संचालकांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम कोपरगाव वकील संघाने काल दुपारी २.४५ च्या सुमारास आयोजित केला होता.त्या वेळी या पाहणी दौऱ्यानंतर आ.काळे यांच्यासह वकील संघाने विवेक कोल्हे यांनाही सत्कारासाठी पाचारण केले असता या बैठकीत सुत्रसंचलन अड्.नितीन खैरनार यांनी केले.
“नाशिक बँक बुडाली त्या नंतर त्या जिल्ह्यातील निफाड,रानवड,आदी सहकारी साखर कारखाने बुडाले पण तेथील शेतकरी श्रीमंत आहे.तसा कोपरगाव तालुक्यातील शेतकरी या दोन्ही नेत्यांनी भिकेला लावला,व दोनच कुटुंबे अति श्रीमंत झाले आहे.असा थेट शाब्दिक हल्ला चढवला व “यांची जिल्हा बँकेला,सहकारी साखर कारखान्याला,बाजार समितीला,कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीला सहमती आहे मात्र ग्रामपंचायत निवडणुकीला मात्र कार्यकर्त्याच्या हाणामाऱ्या होतात.याचे कारणं काय ?-अड्.दिलीप लासुरे
सदर प्रसंगी प्रास्तविक अड्.बी.बी.कडू यांनी केले त्यात त्यांनी आपल्या भाषणात,”आधी नाशिक,बीड.यवतमाळ,उस्मानाबाद व अन्य जिल्हा बँका बुडाल्या आहेत पण आपली बँक आशिया खंडात मोठी असून ती टिकवून ठेवली आहे”.या दोन्ही युवराजांचा सहमती कार्याचा गौरव केला व त्या नंतर नेमक्या विषयाला हात घातला.व हि “सहमती एक्सप्रेस” कोपरगाव शहरातील रस्त्याच्या विकासावरही धावू द्या,शहरात नागरिकांना चालता येत नाही” असे म्हणत असतानाच अगदी समोरच बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अड्.दिलीप लासुरे हे मध्येच उठले व त्यांनी अड्. कडू यांच्या भाषणाचा धागा पकडत.”नाशिक बँक बुडाली त्या नंतर त्या जिल्ह्यातील निफाड,रानवड,आदी सहकारी साखर कारखाने बुडाले पण तेथील शेतकरी श्रीमंत आहे.तसा कोपरगाव तालुक्यातील शेतकरी या दोन्ही नेत्यांनी भिकेला लावला,व दोनच कुटुंबे अति श्रीमंत झाले आहे.असा थेट शाब्दिक हल्ला चढवला व “यांची जिल्हा बँकेला,सहकारी साखर कारखान्याला,बाजार समितीला,कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीला सहमती आहे मात्र ग्रामपंचायत निवडणुकीला मात्र कार्यकर्त्याच्या हाणामाऱ्या होतात.याचे कारणं काय?, “आ.आशुतोष काळे आपण आमदार आहात.” वर्तमान काळात शेतकऱ्यांचे वीजबिल न भरल्याने त्यांच्या वीज जोडण्या का तोडल्या जात आहे ? वीज बिले का माफ होत नाही ?” तुम्हीच या बाबत विधानसभेच्या सभागृहात काय आवाज उठवला आहे?”.त्या बाबत काय पत्रव्यवहार केला आहे? असा तिखट सवाल केला आहे, “गोदावरी कालव्यांचे आवर्तन केवळ ऊस पिकास गृहीत धरून दिले जाते,खरीप व रब्बी,कांदा व भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले जाते? तुम्ही त्यांना वाऱ्यावर का सोडता ? या पिकांची होरपळ झाली आहे”असे म्हणून त्यांनी,”तुम्ही कितीही सहमती राबवा,आगामी विधानसभा निवडणुकीत नगरपरिषदेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे” व “तुम्हा दोघांचे पैसे घेऊन तालुक्यातील मतदार हा तिसऱ्याला निवडून देणार आहे” असे बजावले आहे.आपण आतापर्यंत तेरा निवडणूक हरलो असलो तरी त्या आपण हरलेलो नसून तो तुमच्या काळ्या पैशाचा प्रताप” असल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी त्यांना अडविण्याचा प्रयत्न वकील संघाचे अध्यक्ष अड्.शिरिषकुमार लोहकणे,अड्.औताडे,यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अड्.योगेश खालकर,अड्.मंडलिक,अड्.मोकळं यांनी त्यांना रोखले व ते खरे बोलत आहे.त्यांना अडवू नका अशी मागणी केली आहे.
दरम्यान या प्रसंगी अड्.साहेबराव खालकर यांनी,”तुमच्या सहमती एक्सप्रेसच्या आधारे पन्नास वर्षाहून अधिक प्रलंबित असलेल्या निळवंडेच्या कालव्यांच्या निधीचा प्रश्न सोडवा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून निधी आणा” अशी मागणी केली आहे.तो धागा पकडून त्या वेळी विवेक कोल्हे यांनी आपल्या भाषणात,”पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संमतीने समिती स्थापन करा” व “त्याचा अध्यक्ष निवडा व हा प्रश्न सोडवा ” अशी मागणी केली आहे.व अड्.दिलीप लासुरे यांच्या सुरात सूर मिसळला आहे हे विशेष !व त्यांच्या सकारात्मक विचारांची दखल घेऊ व अंमलबजावणी करू”असे म्हणून वरातीमागून घोडे दामटले आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांच्या सहमती एक्सप्रेसच्या धागा पकडून तुमची कोपरगावातील रस्त्यांना सहमती आहे का ? असा थेट सवाल त्यांना केला आहे.त्यांचे भाषण रोखत विवेक कोल्हे यांनी,”रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचा वास असल्याचा “आरोप करून त्यांची सहमती जागेवरच फेटाळली आहे.ही वादावादी सुरु असताना अड्.मच्छीन्द्र खिलारी यांनी कोल्हेना उद्देशून,”तुम्ही हे बंद करा,हा वादग्रस्त विषय येथे घेऊ नका” असे आवाहन करून तो विषय खंडित केला आहे.
त्या नंतर आपले खंडित झालेले भाषण आ.काळे यांनी सुरु करताना,”आपण न्यायालयीन इमारतीला निधी आणू “असे आश्वासन दिले आहे.मात्र या कार्यक्रमानंतर त्यांनी वकील संघाने आयोजित केलेला चहा पाण्याकडे दुर्लक्ष कडून तसेच जाणे पसंत केले आहे.उपस्थितांचे आभार अड्.गौरव गुरसळ यांनी मानले आहे.मात्र या सभेचे चर्वितचर्वण जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत अड्.दिलीप लासुरे व अड्.बी.बी.कडू यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.तर वकील संघाचे अध्यक्ष अड्.शिरिषकुमार लोहकणे यांनी सूचक मौन पाळले आहे.या घटनेची जिल्ह्यातील चौकाचौकात सर्वत्र चर्चा सुरु आहे.