शैक्षणिक
ऑनलाईन बदल्या तुर्तास स्थगित कराव्यात-…या नेत्याची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली ग्रामविकास विभागाकडून झुंबड सुरु झाली असून ही बदलीची प्रणाली विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान करणारी असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन बदल्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी नुकतीच केली आहे.
“अद्याप दुसरे शैक्षणिक सत्र संपण्यास अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असताना शिक्षकांच्या बदल्या केल्या जात असल्याने शिक्षण क्षेत्रात विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे.बदल्या करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता,शाळांमधील घटणारी विद्यार्थी संख्या,अध्यापनातील स्थैर्य यावर विवरीत परिणाम संभवतो त्यामुळे या बदल्या तूर्त स्थगीत कराव्या”-राजेश परजणे,माजी सदस्य,शिक्षण समिती,जिल्हा परिषद अ.नगर.
ऑनलाईन बदल्यांच्या संदर्भात परजणे यांनी पुढे म्हटले आहे की,”राज्यात सुमारे दोन लाख प्राथमिक शिक्षक आहेत.शिक्षकांची बदली प्रक्रिया सोपी व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागाने ही संगणकीय पध्दत अवलंबविली आहे ही बाब स्वागतार्ह आहे परंतु जर चालू २०२२ – २३ शैक्षणिक वर्षाचे प्रथम सुरू होऊन दोन ते अडीच महिनेच झालेले आहेत.दुसरे सत्र संपण्यास अजून अडीच महिन्यांचा कालावधी बाकी आहे.शैक्षणिक वर्ष संपण्याच्या आतच शिक्षकांच्या बदल्या केल्या जात असल्याने शिक्षण क्षेत्रात विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे.बदल्या करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता,शाळांमधील घटणारी विद्यार्थी संख्या,अध्यापनातील स्थैर्य,शिक्षकांना काम करताना येणाऱ्या अडचणी आदी गोष्टींचाही विचार होणे गरजेचे आहे.एकतर कोरोना महामारीत सुमारे दीड ते दोन वर्षे विद्यार्थ्यांना घरी बसावे लागल्याने त्यांचा अभ्यासाचा सराव कमी झालेला होता.तो अद्यापही भरून निघालेला नाही.त्यातच नवीन शिक्षकांच्या नियुक्त्यांमुळे मागील अभ्यासाचा परिपाठ करून घेणे शिक्षकांना देखील अवघड जाणार आहे.यासाठी शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत आहे त्याच शिक्षकांकडून अभ्यास करून घेणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल.
राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून करण्यात येणाऱ्या ऑनलाईन बदल्या प्रणालीस आमचा अजिबात विरोध नाही.परंतु मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या बदल्यांना किमान १ मे ते १५ जूनपर्यंत तरी स्थगिती देण्यात यावी.ज्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याही बदल्यांना स्थगिती देऊन शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांच्या बदल्यांबाबत विचार व्हावा अशीही मागणी श्री परजणे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे शेवटी केली आहे.