न्यायिक वृत्त
मंजूर हत्याकांड प्रकरण,अटक आरोपीस ३० ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला नामदेव सोनवणे हा आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना आरोपी शंकर नरहरी गावंड,गणेश शंकर गावंड आदींसह सहा जणांनी शिर्डी-लासलगाव रस्त्यालगत केलेल्या हल्ल्यातील आरोपी समाधान बाजीराव सोनावणे यास अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यात ३० ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तर अद्याप या हल्ल्यातील आरोपी राकेश शंकर गावंड व गणेश शंकर गावंड हे अद्याप फरारी असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीसांनी दिली आहे.
दरम्यान या मंजूर हत्या प्रकरणात अ.नगर जिल्हा आदिवासी कोळी महादेव समाज संघटनेने शोकसभा घेऊन या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून फरार आरोपीना अटक करून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी व अदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा”-अमित आगलावे,जिल्हाध्यक्ष,आदिवासी कोळी,महादेव समाज युवक संघ.
हत्या करण्यात आलेले नामदेव सोनवणे यांचे छायाचित्र.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला शोभा नामदेव सोनवणे यांचे पती नामदेव सुधाकर सोनवणे व आरोपी शंकर गावंड व गणेश शंकर गावंड यांची जमीन शेजारी-शेजारी आहे.त्यांच्यात शेतीतील जमिनीतील रस्त्याच्या कारणावरून अनेक दिवसापासून वाद होते.दि.१९ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेचा पती नामदेव सोनवणे हा आपल्या मुलांना चासनळी येथील शाळेत सोडून घरी येत असताना त्यास शिर्डी-लासलगाव या रस्त्यावरील टिळेकर यांच्या दुकानासमोर आरोपी शंकर गावंड,त्यांचा मुलगा गणेश गावंड,राकेश शंकर गावंड,साहेबराव पुंजाजी सोनवणे,रविन्द्र साहेबराव सोनवणे,समाधान साहेबराव सोनवणे आदीं सहा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातातील गजाने,काठीने,दांड्याने,कुऱ्हाड,कोयत्याच्या सहाय्याने फिर्यादीच्या पतीस मारहाण करून गंभीर जखमी केले होते.त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी महिला,तिंचा भाया सुनील सोनवणे,फिर्यादीची जाव उषा सोनवणे आदी साक्षिदार गेले असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान या घटनेतील फिर्यादीचे पती नामदेव सोनवणे यांचे नाशिक येथील सरकारी रुग्णालयात धक्कादायक निधन झाले आहे.यापूर्वी फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रं.३२२/२०२२ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,५०९,१४३,१४४,१४७,१४८,१४९,अ.जा.जमाती (अत्याचार सुधारणा कायदा-२०१५ चे ३ (आय),(आर) ३ (आय) (एस) प्रमाणे गुन्हा दखल केला होता.
दरम्यान यातील जखमी व फिर्यादी महिलेचा पती नामदेव सोनवणे याचे निधन झाल्याने यात आता यात हत्येचे कलम ३०२ वाढविण्यात आले होते.
यातील चार आरोपी शंकर गावंड,साहेबराव सोनवणे,रवींद्र सोनवणे,समाधान सोनवणे आदी चार जणांना २० ऑगष्ट रोजी अटक केली होती.तर समाधान बाजीराव गावंड व गणेश गावंड व राकेश गावंड हे अद्याप फरार होते.त्यातील समाधान गावंड यास पोलिसांनी नुकतीच अटक केली होती.व कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा अतिरिक्त अधिभार असललेल्या श्रीरामपूर येथील न्यायालयासमोर समोर हजर केले होते.त्यास न्यायालयाने ३० ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान अद्याप दोन आरोपी राकेश गावंड व गणेश गावंड हे दोघे फरारी असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.
दरम्यान पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.