निवडणूक
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कधी वाढवणार ?-…या नेत्यांची विचारणा

न्युजसेवा
राहाता- (प्रतिनिधी)
जातनिहाय जनगणना कधी करणार ? आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कधी वाढवणार ? अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा कधी उभारणार ? या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी द्यावीत असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी करीत मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले.दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर नाही.कापूस उत्पादक,सोयाबीन,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही.कोणतीही वस्तू घेतली तर जीएसटी वसूल केला जातो.युवकांना नोकऱ्या नाहीत. देशात मोठ्या प्रमाणात महागाईचा दहशतवाद वाढला आहे.महाराष्ट्रातील उद्योग मात्र दुसऱ्या राज्यात पळविले जात आहेत.महाराष्ट्राला कमजोर केले जात आहे,असा आरोप प्रियांका गांधी यांनी राज्यातील महायुती सरकारसह केंद्र सरकारवर नुकताच केला आहे.

यावेळी आ.बाळासाहेब थोरात,प्रभावती घोगरे,हेमंत ओगले,कोपरगाव मतदार संघाचे उमेदवार संदिप वर्पे यांची भाषणे झाली.प्रारंभी जयश्री थोरात यांनी प्रास्ताविक व स्वागत केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यात प्रथमच प्रियंका गांधी आल्या होत्या.सभेपुर्वी त्यांनी साईमंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.बाळासाहेब थोरात,प्रभावती घोगरे,कोपरगावचे महाआघाडीचे उमेदवार संदिप वर्पे व हेमंत ओगले यांच्या प्रचारार्थ शिर्डी जवळील साकुरी शिवारात काल आयोजित केलेल्या सभेत गांधी बोलत होत्या.जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय साईबाबाजी की जय अशी घोषणा देत प्रियंका गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली.त्या म्हणाल्या,आज येथे सभा होत आहे,त्या मैदानाजवळ साईबाबा बसत होते.आज पहिल्यांदा मला साईबाबांच्या मंदिरात जाण्याचे सौभाग्य मिळाले.आणि खरोखरच ही पवित्र भूमी असल्याची अनुभूती झाली.

राहुल गांधींना मोदी घाबरू लागले म्हणून त्यांच्यावर टीका करण्याचं काम मोदी करतात.
मागील निकाल पाहून घाबरले व आज संविधाना बाबत बोलायला लागले आहेत.अशी टिका करुन गांधी म्हणाल्या की,नवीन रोजगार तयार करायचे नाही.शेतकऱी आज संकटात सापडल्याने कोणत्या तोंडाने तुम्ही महाराष्ट्र पुढे नेणार म्हणता,मोदीजींच्या राज्यात सत्याची बाजू कुठे राहिली आहे.बाळासाहेब ठाकरे असं राहुल गांधी यांच्याकडून वदवून घ्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे यांना दिले होते. याला उत्तर देत आमचे विचार वेगळे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते शिवरायांचा सन्मान करत नाहीत. त्यांनी संसदेच्या बाहेरील शिवरायांचा पुतळा हटवला. सिंधुदुर्ग मधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, कारण पुतळा बनवतानाच भ्रष्ठाचार झाला होता. शिवरायांचा अपमानच करणार असाल, तर नाव घेऊन काय उपयोग? काँग्रेसचा कुठलाच नेता छत्रपती शिवाजी महाराचांचा अपमान सहन करणार नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
महाराष्ट्रातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात घेऊन गेले ही समानता आहे का ? इंदिराजींनी अनेक निर्णय घेतले पण भेदभाव केला नाही. असे स्पष्ट करीत प्रियंका गांधी म्हणाल्या मोठे मोठे उद्योग आज महाराष्ट्रातून काढून नेल्याने बेरोजगारी वाढली आणि आज महाराष्ट्र मजबूत करण्याचं मोदी सभेतून कसे काय बोलतात जनतेचे लक्ष विचलित करण्या शिवाय हे कोणत काम करत नाही. मोदी भाषणातून आतंक नहीं है म्हणतात एकदा महाराष्ट्रातील लोकांना भेटा त्यानंतर ते सांगतील काय आतंक आहे.महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्या आज आहेत. निवडणूक आली म्हणून पैसे दिले जातायत. दहा वर्ष यांचं सरकार देशात.राज्यात अडीच वर्ष सरकार मग आजच का लाडकी बहीण योजना आणली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मोदींनी सगळ्यांना कमकुवत करण्याचं काम केलं. उद्योगपतींना मात्र कर्जमाफी,शेतकऱ्यांना काय मिळालं पैसे नाही म्हणतात मग उद्योगपतींचे कर्ज माफ कसे झाले.तुम्हाला उत्तर द्यावे लागेल.अशी टिका मोदी यांच्यावर करीत दोन लाख सरकारी पदे आज रिक्त ती सुद्धा भरली जात नाही.. युवक आत्महत्या करायला लागेल.जातीच्या नावावर लक्ष विचलित करण्याचं काम यांच्याकडून सुरू असुन संविधान बाबत यांना गांभीर्य नाही.इथे महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर पैसे, ईडीचा वापर करून सरकार तोडल असे गांधी यांनी सांगितले.
यावेळी आ. बाळासाहेब थोरात,प्रभावती घोगरे,हेमंत ओगले,संदिप वर्पे यांची भाषणे झाली. प्रारंभी जयश्री थोरात यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
देशातील या भूमीने देशाला दिशा दाखवली आहे.स्वातंत्र्याची लढाई इथूनच मजबूत झाली.”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.तोच साधू ओळखावा.देव तेथेची जाणावा’ असा मराठीतून श्लोक म्हणत संत तुकारामांचा दाखला देत मानवतेचा संदेश दिला.साईबाबांचा समानतेचा मानवतेचा संदेश हाच खूप महत्त्वाचा असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
शिर्डीत मोठी दहशत असल्याचे ऐकले आहे.घाबरू नका खंबीरपणे उभे रहा,आपल्याकडे मतचा अधिकार आहे.जो घाबरवण्याचा प्रयत्न करतो तोच जास्त घाबरट असतो ही भिती संपवून टाका अशी टिका प्रियंका गांधी यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. ,