आंदोलन
राष्ट्रवादीच्या…’त्या’ आमदाराविरुद्ध गुन्हा आणि विचित्र योगायोग !

न्यूजसेवा
कोपरगाव – (नानासाहेब जवरे )
सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पंचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन केले असताना त्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आ.अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी त्यांना एका दूरचित्रवाहिनीशी मुलाखत देत असताना त्यांना आक्षेपार्ह भाषेत उल्लेख करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले असल्याने त्यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पिंपळवाडी तालुका राहाता येथील किर्तनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज (वय -30) यांनी गुन्हा दाखल केला असल्याने नगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या व महायुतीच्या योगायोगाची जोरात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान या संबंधी कोपरगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याबाबत मोठी गुप्तता पाळल्याचे दिसत होते.मात्र या बाबत आमच्या प्रतिनिधीने सायंकाळी उशिरा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या गुन्ह्यास दुजोरा दिला आहे.व सदर गुन्हा अकोला पोलीस ठाण्यात वर्ग केला असल्याची माहिती दिली आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचन करताना नगर जिल्ह्यातील सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.त्यावरून मुस्लिम समाजात नाराजी व्यक्त होत असताना त्यांचे बाबत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आ.अमोल मिटकरी यांनी एका दूर वाहिनीवर मुलाखत देत असताना सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांचेवर खालच्या भाषेत जाऊन टीका केली आहे.त्यावरून महंत रामगिरिजी महाराज यांचे शिष्य वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.महंत रामगिरिजी महाराज यांना व ज्या बेटाची ते सेवा करतात त्या ब्रह्मलीन संत गंगागिरिजी महाराज यांना गेली 177 वर्षे अ.नगर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यात मानणारा मोठा भक्त व शिष्य वर्ग आहे.त्यांचे कार्यही मोठे आहे.त्यांच्या धार्मिक कार्यासाठी संपूर्ण जगाने मान्यता दिली असून ग्रिनीच बुकात त्याचे अनेक रेकॉर्ड झालेले आहे.इंग्रज राजवटीत भूकबळी होत असताना तत्कालीन ग्रामस्थांना,”लेने को हरिनाम,देणे को अन्नदान” म्हणत वाचविण्यात त्यांचे योगदान मोठे राहिले आहे.या शिवाय व्यसन मुक्ती करण्यात व समाजाला अध्यात्मिक क्षेत्रास लावण्यासह अन्नदान आणि चांगल्या प्रथा परंपरा सुरू करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.त्यामुळे या श्री क्षेत्र सराला बेटाचा मोठा इतिहास राहिला असून यावर अनेकांनी अभ्यास करून पी.एच.डी.मिळवल्याची उदाहरणे आहेत.संत नारायणगिरीजी महाराज यांचे तर याबाबत वर्चस्व निर्विवाद राहिले होते.त्यांची विरक्ती ही गंगागिरिजी महाराज यांचे तोडीची मानली जात होती.त्यांची भक्ती अंतर्वक्र होती परिणामी त्यांचा अध्यात्मिक,राजकीय क्षेत्रातील दबदबा मोठा होता.

“महंत रामगिरिजी महाराज हे ज्या बेटाची ते सेवा करतात त्या ब्रह्मलीन संत गंगागिरिजी महाराज यांना गेली 177 वर्षे अ.नगर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यात मानणारा मोठा भक्त व शिष्य वर्ग आहे.त्यांचे कार्यही मोठे आहे.त्यांच्या धार्मिक कार्यासाठी संपूर्ण जगाने मान्यता दिली असून ग्रिनीच बुकात त्याचे अनेक रेकॉर्ड झालेले आहे.इंग्रज राजवटीत भूकबळी होत असताना तत्कालीन ग्रामस्थांना,”लेने को हरिनाम,देणे को अन्नदान” म्हणत वाचविण्यात त्यांचे योगदान मोठे राहिले आहे हे कोणालाही विसरता येणार नाही याचे भान ठेवायला हवे”

त्यांचे सन -2009 साली महानिर्वाण झाल्यानंतर त्यांचा वारसा महंत रामगीरिजी महाराज यांचेकडे भाविकांनी सोपवला होता व तो तह्यात सुरू आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात या संस्थानचा मोठा भौतिक विकास केला आहे.मात्र दिनांक 10 ऑगस्ट रोजी त्यांचे सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे अखंड हरिनाम सप्ताहात जाहीर प्रवचन सुरू असताना त्यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक महमंद पैगंबर यांचे बाबत वस्तुस्थितीदर्शक विधान केल्याने (काहींचे म्हणणे वादग्रस्त ) त्यांचे विरुद्ध काही असामाजिक तत्वांनी मोठे गारूड केले असून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.विशेष म्हणजे दोन दिवस आधी भेट देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकादशीची खिचडीची पंगत जाहीर करून दिली व तिचा दिवसभर वाटप करताना कंठशोष सुरू होता.योगायोग म्हणजे महंत रामगीरीजी त्यांच्या व्यासपीठावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसात सदरचा वाद त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी,”आपण राज्यातील संताच्या केसाला धक्का लागू देणार नाही” अशी राणा भीमदेवी घोषणा केली होती.मात्र त्यांच्या बातमीची शाई वाळण्याच्या आत महंत रामगीरीजी महाराज यांचेवर आगामी विधानसभेची राजकीय गोळाबेरीज होऊन वैजापूर,राहाता आदी ठिकाणी गुन्हे दाखल होऊ लागले आहे.त्यातच कहर म्हणजे त्यांच्या महायुतीच्या म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते असलेल्या आ.अमोल मिटकरी यांनीच अकोला जिल्ह्यात एका वाहिनीवर मुलाखत देताना रामगीरीजी महाराज यांच्यावर मोठे तोंडसुख घेतले आहे.त्यामुळे राज्यभर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.विशेष म्हणजे त्यांच्या भाषेचा स्तर इतका घसरला की आपण कोणाविरुद्ध बोलतो ? त्या व्यक्तीची योग्यता काय ? आपली योग्यता काय ? याचे भान या महाशयांना राहिले नाही.आपण विधानसभेत बोलतो की बाहेर बोलतो याचे भान राहिले नाही.शेवटचा योगायोग म्हणजे ज्या सिन्नर तालुक्यात हा सप्ताह झाला तेथील आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांचे ताब्यात आहे तर काल ज्या ठिकाणी आ.मिटकरी यांचेवर गुन्हा दाखल झाला तो विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात म्हणजेच आ.आशुतोष काळे यांच्या ताब्यात आहे हे विशेष ! देशातील अल्पसंख्याक समाज हा भाजपपासून लोकसभा निवडणुकीत दूर गेल्यानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात कोपरगाव तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारास आपण या निवडणुकीच्या वेळी आपले काम करू शकणार नाही हे स्पष्ट बजावले असताना हा घटनाक्रम उघड होताना दिसत आहे.त्यामुळे यावर उत्तर नगर जिल्ह्यात व राज्यात उलटसुलट योगायोगाच्या चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे ही अल्पसंख्याक मतांची गोळाबेरीज तर सुरू नाही ना अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे आणि ती चुकीची ठरवणे त्यामुळेच अवघड जात आहे.
दरम्यान या संबंधी कोपरगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याबाबत मोठी गुप्तता पाळल्याचे दिसत होते.मात्र या बाबत आमच्या प्रतिनिधीने सायंकाळी उशिरा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या गुन्ह्यास दुजोरा दिला आहे.व सदर गुन्हा अकोला पोलीस ठाण्यात वर्ग केला असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान आ.अमोल रामकृष्ण मिटकरी यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झिऱ्हो गुन्हा क्रं.1 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 192,196,302 अन्वये गुन्हा दाखल करून तो अकोला पोलिसांकडे वर्ग केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.कोपरगाव तालुक्यात परिस्थिती शांत व नियंत्रणाखाली आहे.
प्रतिक्रिया संपर्क – 9423 43 9946.