जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या शहरात येणार जनसंवाद यात्रा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी )

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार दि.०८ पासून जनसन्मान यात्रा काढली आहे.राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार दि.१० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता कोपरगाव शहरात येणार आहे.या यात्रेच्या स्वागताची आ.आशुतोष काळे यांनी जय्यत तयारी केली असून राष्ट्रवादीचे झेंडे, स्वागताचे होर्डिंग्सने संपूर्ण कोपरगाव शहर राष्ट्रवादीमय झाले आहे.

    

जनसंवाद यात्रे निमित्त कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिरापासून श्री साईबाबा तपोभूमी पर्यंत या जनसन्मान यात्रेचे मतदार संघातील नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे,होर्डिंग व अजित पवार यांच्या स्वागताचे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

  आगामी काळात विधानसभा निवडणुका आल्याने सर्वच पक्ष आणि त्यांचें नेते कामाला लागले आहे.त्याला अजित पवार यांची राष्ट्रवादी अपवाद नाही .उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आज नाशिकच्या दिंडोरीत सुरुवात झाली आहे.उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे.ही  यात्रा आगामी काळात शनिवार रोजी कोपरगाव मतदार संघात येत आहे.मतदार संघातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरातील बेटातील पुलावर या यात्रेचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ.आशुतोष काळे स्वागत करणार आहेत.त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री,राज्यातील पदाधिकारी आदींची जनसन्मान यात्रेच्या बसमधून श्री साईबाबा तपोभूमी पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.

    त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिरापासून श्री साईबाबा तपोभूमी पर्यंत या जनसन्मान यात्रेचे मतदार संघातील नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे,होर्डिंग व अजितदादा पवार यांच्या स्वागताचे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असून ते राज्यातील जास्तीत जास्त जनतेशी संपर्क साधणार आहेत.

कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चरीटेबल ट्रस्टच्या सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात मतदार संघातील माता भगिनींशी उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना राबविलेल्या अनेक महत्वाच्या जन कल्याण योजनांबाबत हितगुज करणार आहेत.या महिला मेळाव्यासाठी मतदार संघातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close