जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मत नाही;पैसा परत,शिर्डी मतदार संघातील घटना उघड ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

शिर्डी लोकसभा निवडणूक काल मोठ्या उत्साहात पार पडली असताना आज कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडील आपेगाव येथील मतदारांना वाटण्यात आलेली ०१ लाख १४ हजारांची रक्कम दोन्ही गडावरील यंत्रणेने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारास न केल्याने परत नेल्याची विश्वसनींय माहिती हाती आल्याने मतदारांत खळबळ उडाली आहे.

”लोकसभेसह सर्वच निवडणुकांत पैसा देऊन मते घेणे हे घटनाकारांनी निषेधार्ह ठरवले असताना काही असामाजिक तत्व मतदारांना प्रलोभन दाखवून मते घेत असून आपेगाव येथील घटना निंदनीय असून दिलेले पैसे परत घेणे हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा घोर अपमान असल्याने यातील सदर उमेदवार आणि या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्वांची मानहानी करणारी आहे;याचा दुष्परिणाम आगामी निवडणुकीत नक्कीच दिसून येईल”-विवेकानंद शिंदे,कार्यकर्ते आपेगाव,ता.कोपरगाव.

  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडलं आहे.राज्यातील ११ तर देशातील ९६ मतदारसंघातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार,महाराष्ट्रात काल सायंकाळी ०६  वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४% टक्के मतदान झालं असल्याची माहिती मुख्यनिवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. दुसरीकडे देशात ९६ मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ६७.२५ टक्के मतदान झालं असल्याची माहिती हाती आली आहे. तर शिर्डी मतदार संघात मतांची आकडेवारी ६१.०३ टक्के झाली आहे.तर कोपरगावात हि ६१.१८% आहे.

   दरम्यान राज्यभरात अनेक नागरिकांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.तर काही दक्षिण भागात पैशाचा पाऊस पडला असल्याच्या बातम्या आहेत.तर भागात मतदानादरम्यान गोंधळाच्या काही घटना समोर आल्या आहेत.यातील एक घटना लक्षवेधी ठरली असल्याची माहिती समोर आली असून हि घटना उत्तर अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आहे.या ठिकाणी महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे हे होते.तर महाघाडीचे उमेदवार उद्धव सेनेचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे हे होते.यात सकाळी मतदानाचा वेग मोठा होता.मात्र दुपारनंतर हा वेग मंदावला होता.मात्र दरम्यान यात नाट्यमय घटना घडून आली असून एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी सांभाळली होती.त्यासाठी आपले कृषीमंत्री दादा भुसे यांचेकडे सर्व सूत्र सोपवली असल्याची माहिती आहे.मात्र या निवडणुकीत आपले पारडे हलके असल्याची बातम्या धडकल्यावर त्यांची धाकधूक वाढली होती.व त्यांनी दुपारून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपले ठेवणीतील खास हत्यार बाहेर काढल्याची माहिती आहे.त्यासाठी त्यांनी (भुसे यांनी ) एकूण मतदाराच्या २०% दाणापाणी देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र पश्चिम गडावरील नेत्यांनी सदर प्रमाण अत्यंत नगण्य असून यातून कार्यकर्त्यांत भांडणे होतील असा इशारा देऊन हि टक्केवारी ७० % करावी (ते नेहमी त्या रीतीने वाटप करतात हा नेहमीचा अनुभव) अशी मागणी करून त्याची अंमलबंजावणी करण्याने निश्चित केले होते.मात्र मोठे चर्वितचर्वण होऊन हि रक्कम एकूण मतदारांच्या ४० % मतदारांना देण्यावर सर्वांचे एकमत झाले होते.व प्रत्येक जोडीस ५०० हे प्रमाण ठरले होते.म्हणजे प्रति मत २५० रुपये हे गृहीत धरून (मतदारांचा कोंबडीपेक्षा कमी भाव !) हा दानापाणी सोयीस्कररित्या आपल्या यंत्रणेमार्फत रवाना केला होता.यात मतदान केंद्रनिहाय अलग १० हजारांचा शिधापाणी होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.दरम्यान या निर्णय प्रक्रियेस मोठा वेळ खर्ची पडला होता.परिणामी दुपारचे ०२ वाजून गेले होते.सदर रक्कम त्यांनी अडीच वाजेच्या सुमारास पोहच केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यानुसार आपल्या कार्यकर्त्यांकडे रवाना झाली होती.मात्र यावेळी ज्यांना हि रक्कम वाटली जाते त्या मतदारांनी वंचितकडे धाव घेतल्याने हि रक्कम वाटायची कोणाला ? हा यक्ष प्रश्न या कार्यकर्त्यांना न पडला तर नवल होते.अर्थातच यातील थोडीबहुत रक्कम वाटली जाते व उर्वरीत कार्यकर्ते आपले खिसे गरम करतात हि नव्याने सांगण्याची गरज नाही.


  दरम्यान यातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी हि रक्कम आपापसात वाटून घेतली असल्याची माहीती आहे.मात्र ज्यांना हि रक्कम मिळाली नाही ते अतृप्त आत्मे शांत बसतील तर नवल ! त्यांनी लागलीच हि खबर आपल्या वरिष्ठ नेत्याना हातोहात (मोबाईलद्वारे) कळवली होती.तर बऱ्याच ठिकाणी यातील काहीं कार्यकर्त्यानी सदर रक्कम विधायक कामास लागावी म्हणून कोणी मंदिरास कोणी सामाजिक कार्यास देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.मात्र बहुतांशी कार्यकर्त्यानी मात्र ती आपल्या खिशात घातली होती.त्यामुळे अनेकांना कसूनसे झाले होते.त्यातच वर्तमान लोकप्रतिनिधीने त्या गावात भेट देऊन पाहणी केली असता काही कार्यकर्त्यांनी रक्कम शिल्लक असल्याची माहिती कानावर घातली होती.त्यांनी त्या ठिकाणी काही एक न बोलता आपल्या इच्छितस्थळी पोहचल्यावर आपली कारवाई करून पश्चिम गडावरील आहेर आणि ईशान्य गडावरील पगारे नामक कर्मचारी पाठवून सदर रकमा ताब्यात घेतल्या असल्याच्या बातम्या असून सदर रक्कम परत घेतल्यावर आपेगावातील कार्यकर्त्यानी रक्कम परत दिल्याच्या सह्या घेण्यास विसरले नाही.कारण रक्कम देताना सह्या घेतल्या होत्या.त्यामुळे संतापलेल्या कार्यकार्त्यानी मागे उमेदवार आणि या नेत्यांना शिव्यांची लाखोली न वाहिली तर नवल !

  निवडणुकांच्या काळात मत खरेदी करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तू देण्याचे प्रकार भारतात होत असतात.याचं एक मुख्य कारण म्हणजे राजकारणात भयानक स्पर्धा निर्माण झाली आहे.निवडणुकीतली स्पर्धा उमेदवारांना रोख रक्कम किंवा दारू,हॉटेल खुले करणे यासारखी विविध आमिषं देण्यासाठी प्रोत्साहित करत असते.त्यातून तरुण पिढीचे मोठे नुकसान होत आहे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे याचा विचार कोण करणार ? या मतविक्यांचा बंदोबस्त कसा करायचा हा यक्ष प्रश्न आहे.




   त्या वृत्तानुसार कोपरगाव तालुक्यातील आपेगावात येऊन १४३८ मतदार असून तेथे एकूण ६०% मतदान झाले होते.त्यांना शिधा पाणी वाटण्यास सुमारे १.१४ लाखांची रक्कम आली होती अशी माहिती आहे.त्यानुसार त्यांनी यातील १४ हजारांची रक्कम दोन गटात आपापसात प्रत्येकी ०७ हजार वाटली असल्याची माहिती असून उर्वरित रक्कम त्यांनी अर्धवट म्हसोबा मंदिराच्या स्लॅब टाकण्यास देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या दोन्ही गडावरील यंत्रणा (दोन कर्मचारी) हजर होऊन त्यांनी हि रक्कम त्यांच्या पचनी पडू दिली नाही.त्यांनी आज सायंकाळी सदर ०१ लाख रुपयांची रक्कम पुन्हा परत नेली असल्याने कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडात मारून घेतली आहे आता बोला ! असाच प्रकार कासली,करंजी,नाटेगाव आणि पूर्ण तालुक्यात घडल्याच्या बातम्या आहेत खरे खोटे देव जाणो !मात्र या घटनेने मात्र एकनाथ शिंदे गटाचे खा.सदाशीव लोखंडे मात्र टीकेचे धनी झाले आहे हे मात्र नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close