जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरटे रंगेहात पकडले,कोपरगावात दोन अटकेत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

 
  कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची रब्बी पिके ऐन भरात आली असताना चोरट्यांनीं पाणबुडी विद्युत पंप चोरी करण्याचा धडाका सुरु ठेवल्याने शेतकरी हैराण झाले होते.त्यासाठी नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक तपासी पथक नियुक्त केले होते.त्या पथकास चोरटे शोधण्यात यश आले असून त्यांनीं आरोपी कृष्णा गंगाधर सानप (वय-३१),योगेश छगन माळी (वय- २६) दोघे रा.बत्तरपूर यांना अटक केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

फिर्यादी संपतराव गरुड यांनी याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात १० हजार रुपये किमतीचा पाच अश्व शक्तीचा विद्युत पंप चोरीचा गुन्हा दाखल केला होता.त्यानुसार पोलीस निरीक्षक कोळी यांनी यासाठी तपासी पथक नियुक्त केले होते.त्यांनी कसून शोध घेतला असता त्यांना दोन आरोपी संशयास्पद आढळून आले होते.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांनी मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांना विविध चोऱ्या करून वेठीस धरले होते.याआधी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर दौलतराव जाधव असताना त्यांनी एक टोळी पकडली होती त्यात सदर चोरटे विद्युत पंपाची तांब्यांची तार काढून कोपरगाव शहरातील एका इलेक्टरीकल दुकानात विकत होते.त्यांनी त्याचा छडा लावून चोरटे जेरबंद केले होते.त्यांनी जेऊर कुंभारी,जेऊर पाटोदा,सोनेवाडी,डाऊच खुर्द आदी परिसरात धुमाकूळ घातला होता.त्यानंतर हि दुसरी टोळी पकडली गेली आहे.

   यातील फिर्यादी संपतराव राजाराम गरुड यांनी याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात १० हजार रुपये किमतीचा पाच अश्व शक्तीचा विद्युत पंप चोरीचा गुन्हा क्रं.३७/२०२४ भा.द.वि.कलम ३७९ अणव्ये हा दाखल केला होता.त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी यासाठी तपासी पथक नियुक्त केले होते.त्यांनी कसून शोध घेतला असता त्यांना वरील आरोपी संशयास्पद आढळून आले होते.त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी पोपटासारखी कबुली दिली होती.त्यांना पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले आहे.या कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    दरम्यान या पथकात पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मर्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप वाखुरे,पो.हे.कॉ.संदीप बोटे,पो.कॉ.अंबादास वाघ,नवनाथ गुंजाळ,पोलीस नाईक रामा साळुंके आदींनी महत्वपूर्ण भुमीका निभावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close