जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

दुधाच्या अनुदानाचा नवीन शासनादेश,निर्लज्जपणाचा कळस !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विशेष म्हणजे शासनाच्या १९ जून २०१७ च्या जीआर मध्ये दुधासाठी जो भाव निश्चित करण्यात आला होता,म्हणजे २७.०० रुपये,तेवढाच आज पण,म्हणजे तब्बल सात वर्षानंतर तोच २७.०० रुपये कायम ठेवण्यात आला आहे.दूध उत्पादनाच्या खर्चात प्रचंड वाढ झाली असताना.सोबत- जुन्या जीआर चा इमेज फोटो.

  

विधान भवन,नागपूर मधील बैठकीमध्ये जाहीर केल्याप्रमाणे दोन महिन्यासाठीचे अनुदान न देता फक्त एक महिन्याचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.म्हणजे सदरची योजना दिनांक ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ एवढ्याच मर्यादित कालावधी साठी आहे.

विधान भवन,नागपूर मधील बैठकीमध्ये जाहीर केल्याप्रमाणे दोन महिन्यासाठीचे अनुदान न देता फक्त एक महिन्याचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.म्हणजे सदरची योजना दिनांक ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ एवढ्याच मर्यादित कालावधी साठी आहे.

   या जीआर मध्ये जवळपास नेहमीप्रमाणे १२अटी,निकष आहेत.म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे.केंद्र शासनाच्या अन्नसुरक्षा व मानक संस्थेच्या (FSSAI) गाईच्या दुधासाठी ३.२% फॅट व ८.३% एसएनएफ सुधारित मानकाप्रमाणे,मध्यंतरी राज्य सरकारने जीआर काढला होता.त्यात पण पुन्हा बदल करून,यू टर्न घेऊन, ३.५/८.५ गुणप्रत साठी हा दर जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे ३.२ /८.३ गुणप्रतीसाठी प्रत्यक्षात २५.५ रुपये प्रति लिटर,म्हणजे १.५ रु.प्रतिलिटर कमी मिळणार आहे.

पत्रकार परिषद मध्ये मंत्री महोदयांनी २९ रुपये दर जाहीर केला होता.परंतु जीआर प्रमाणे २५.५ मिळणार असल्यामुळे ३.५ रुपये कमी मिळणार आहेत.उत्पादन खर्चावर आधारित दर तर अजून खूप लांब आहे.म्हशीच्या दुधाच्या दरा बाबतीमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही.थोडक्यात अनुदान योजनेचा कालावधी कमी केला,दुधाचा दर कमी केला,दुधाच्या आधारभूत गुणप्रती मध्ये बदल केला.

काही महत्त्वाच्या अटी खाली देत आहे.

  खाजगी किंवा सहकारी दूध संघाने शासनाकडे अर्ज करणे बंधनकारक आहे.त्यांनी अर्जच केला नाही तर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही.

दूध संघाने जर वरील ठरवलेला दर दिला नाही तर शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील.पशुधनाचे एअरटॅग,शेतकऱ्याची बँक खाते,आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक असेल.यासाठी दिलेला कालावधी अत्यल्प आहे.सदरच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक मार्फत विशेष सॉफ्टवेअर अजून विकसित होणे अजून बाकी आहे.

सोबत: नवीन जीआर व त्याची लिंक
https://drive.google.com/file/d/1vPof2j5PUPlcEtXxobDqKAH1e3JT_3XV/view?usp=sharing
अशीच परिस्थिती इतर शेतमालाची पण आहे.थोडक्यात शाश्वत,कायमस्वरूपी मागण्यासाठी आपला संघर्ष चालूच राहणार.

सतीश देशमुख,

B.E.(Mech.),पुणे,अध्यक्ष,फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स
९८८१४९५५१८.समन्वयक,दूध संघर्ष महाअभियान
एकच ध्यास-शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close