जाहिरात-9423439946
साहित्य व संस्कृती

राज्यातील सात जणांना ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात  नागू विरकर,गणपत जाधव,आप्पासाहेब खोत,मनीषा पाटील हरोलीकर,प्रवीण पवार,डॉ.रवींद्र कानडजे,डॉ.मारोती  घुगे यांना भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

दरम्यान या पुरस्कारात प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख १५ हजार स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.या वर्षी कथासंग्रह,कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.ट्रस्टकडे आलेल्या एकूण ६७ साहित्य कृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये नागू विरकर (मसाई वाडी,सातारा),गणपत जाधव (यशवंतनगर जि.सोलापूर),आप्पासाहेब खोत (जाखले जि.कोल्हापूर),मनीषा पाटील (देशिंग हरोली,जि.सांगली),प्रवीण पवार (खंबाळ जि.धुळे),डॉ.रवींद्र कानडजे (बुलडाणा ),डॉ.मारोती घुगे (अंबड जि.जालना) या लेखकांचा समावेश असल्याची माहिती भि.ग.रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

   भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह,कादंबरी,कथासंग्रह व समीक्षा या साहित्यप्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.यावर्षी २०२२ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

  

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे व सुप्रसिद्ध लेखक डॉ.प्रशांत आंबरे यांच्या शुभहस्ते आणि कोपरगावचे माजी आ.व कोपरगाव तालुका सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै.के.बी.रोहमारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनी दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता के.जे.सोमैया महाविद्यालय,कोपरगाव येथे केले जाणार आहे.

हेडाम-नागू विरकर (ग्रामीण कादंबरी-समीक्षा पब्लिकेशन,पंढरपूर),हावळा-गणपत जाधव (ग्रामीण कथासंग्रह-शब्द शिवार प्रकाशन,मंगळवेढा),काळीज विकल्याची गोष्ट-आप्पासाहेब खोत (ग्रामीण कथासंग्रह,ललित पब्लिकेशन, शिवडी,मुंबई) विभागून,नाती वांझ होताना-मनीषा पाटील हरोलीकर (ग्रामीण कविता संग्रह,संस्कृती प्रकाशन,पुणे)
भुई आणि बाई-प्रविण पवार(ग्रामीण कविता संग्रह,परिस पब्लिकेशन,सासवड,पुणे ) विभागून,शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श-डॉ.रवींद्र कानडजे (ग्रामीण समीक्षा,नाग-नालंदा प्रकाशन,विशाल नगर,इस्लामपूर )
१९८० पूर्वीची ग्रामीण कविता :प्रेरणा आणि प्रवृत्ती-डॉ.मारुती घुगे(ग्रामीण समीक्षा,यशोदीप पब्लिकेशन्स,पुणे) विभागून

   दरम्यान या पुरस्कारात प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख १५ हजार स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.या वर्षी कथासंग्रह,कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.ट्रस्टकडे आलेल्या एकूण ६७ साहित्य कृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ.भीमराव वाकचौरे,डॉ.शिरीष लांडगे,लक्ष्मण महाडिक,डॉ.प्रमोद आंबेकर,डॉ.गणेश देशमुख,डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.  संजय दवंगे यांच्या संयुक्त निवड समितीने केले आहे.वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने आयास (शंकर विभूते) शाळा (ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर),अस्तित्व गमावलेली माणसं (महेंद्र गायकवाड),शिवार माती डॉट कॉम (प्रा.मुकुंद वलेकर),अंतस्थ हुंकार (शिवाजी शिंदे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड समितीने विशेष निर्देश  केला आहे.

   पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हटले आहे की,“पशु-जीवन,अभावग्रस्त देवदेवता,धार्मिकता,कष्टमय जगणे, गजी नाच,अंगात येणे,माणूस,जनावरे यांचं आजारपण,उपचार,भटक्या जाती-जमातीच्या मुलांच्या शिक्षणाची होलपट असा धनगरी जीवनाचा परिप्रेक्ष्य असलेली हेडाम ही कादंबरी माणदेशी ग्रामीण जीवनाचे वास्तव आपल्यासमोर समर्थपणे मांडते.माणदेशाचा दुष्काळ,फिरस्त्या मेंढपाळ धनगरांचा संघर्ष,त्याचबरोबर सांस्कृतिक, धार्मिक तसेच भाषिक अशा अनेक बाजू या कादंबरीत मांडल्या आहेत.

   ‘हावळा’ कथासंग्रहातील कथा केवळ ग्रामीण जीवनाचे प्रत्ययकारी अनुभवविश्व व दुष्काळाची दाहकता नोंदवत नाहीत,तर अखिल मानवतेचा विचारही देतात.तर ‘काळीज विकल्याची गोष्ट’ मधील कथा ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या कथा आहेत.त्यातून दुष्काळ,दूध उत्पादक आणि त्यांचे संघ,ऊस उत्पादक आणि साखर कारखाना, स्त्री-पुरुष,कुटुंब आदीतील विविध जीवनानुभवांचे प्रभावी चित्रण या कथांमधून पुढे येते.

   ‘नाती वांझ होताना’ कवितासंग्रहातील कवितांमध्ये ग्रामीण स्त्रीचे विविध पातळ्यांवर होणारे शोषण,चित्रित झाले आहेच,पण समाजामध्ये झालेल्या नव्या बदलांनाही त्यातील स्री संयतपणे थेट भिडते.

  ‘भुई आणि बाई’ संग्रहाचे कवी प्रवीण पवार यांची कविता ही वेदनेतून आलेली आहे आणि वेदनेतून आलेले साहित्य हे वेदने इतकच खोल असतं,म्हणून त्याचे ठसे उमटल्याशिवाय राहत नाहीत.बाई वांझोटी व भुई पडीक असली तर तिचे अस्तित्व मूल्यहीन होते हा विचार त्यांच्या कवितेने मांडलेला आहे.आजीपासून आजच्या तरुण मैत्रिणीपर्यंत अशा तीन पिढ्यांच्या वेदनेचा आलेख ‘भुई आणि बाई’ त प्रवीण पवार यांनी रेखाटलेला आहे.

   ‘शेतकरी जीवन संघर्ष : ऐतिहासिक परामर्श’ हे रवींद्र कानडजे यांचे कृषिविषयक समस्यांवरील अभ्यासपूर्ण विवेचन आहे.या ग्रंथात त्यांनी आदीम काळापासून आजपर्यंत सुरू असलेल्या शेतीमातीशी निगडित माणसांच्या जीवन संघर्षाची महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे.


   डॉ.मारुती घुगे यांनी ‘१९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती’ या ग्रंथातून ग्रामीण कवितेचा पुनर्शोध घेण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्यासारखा आहे.ग्रामीण कवितेच्या उगमाचा शोध घेताना त्यांनी लोकसाहित्याशी असणारे तिचे अनुबंध स्पष्ट केले आहेत.त्यामुळेच या समीक्षा  ग्रंथांची यंदाच्या  पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. 

   माजी आ.कै.के.बी.रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे  सामाजिक कृतज्ञतेच्या जाणीवेतून १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो.ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना  प्रोत्साहन देणे,हा यामागील मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे  यांनी केले आहे.


सदर पुरस्कार वितरणाचे हे ३४ वे वर्ष असून पुरस्कार योजनेचे ३५ वे वर्ष आहे.आजपर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील १७० पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे.या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे व सुप्रसिद्ध लेखक डॉ.प्रशांत आंबरे यांच्या शुभहस्ते आणि कोपरगावचे माजी आ.व कोपरगाव तालुका सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै.के.बी.रोहमारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनी दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता के.जे.सोमैया महाविद्यालय,कोपरगाव येथे केले जाणार आहे.या पुण्यस्मरण व भि.ग.रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास साहित्य रसिक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.संजीव कुलकर्णी व के.जे.सोमैया महाविद्यालय प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी शेवटी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close