जाहिरात-9423439946
जलसिंचन

गोदावरीचे रब्बी आवर्तन..या तारखेपासून होणार सुरु

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आवर्तनाची मागणी लक्षात घेवून पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांना नवीन वर्षात १ जानेवारी रोजी पहिले रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

नूतन वर्षात १ जानेवारी रोजी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून प्रथम बिगरसिंचन अर्थात पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव प्रथम भरून घेतले जाणार असून १० तारखेपासून शेतकऱ्यांना सिचनासाठी पाणी देण्यात येणार आहे-आ.आशुतोष काळे.

चालू वर्षी पर्जन्य मोठ्या प्रमाणावर झाला आहे.त्यामुळे भूजल पातळी वाढली आहे.त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी रोडावली आहे.त्यामुळे मागणीच्या अभावी जलसंपदा विभागाला हे आवर्तन कधी द्यावे असा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता.मात्र याबाबत आता आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला आहे.व अधिकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी गोदावरी कालव्यांना एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्याचा निर्णय घेतला आहे.मागील पाच वर्षात लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तनाचा लाभ मिळत नव्हता.अनेक लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहत होते.मुख्य वितरिका दुरुस्ती रखडल्या होत्या.आवर्तन सुरु असतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अशा अनेक अडचणींकडे आ.काळे यांनी पाच वर्षानंतर प्रथमच कोपरगाव येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा नासिकचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ यांचे लक्ष वेधले होते.त्यांनी मांडलेल्या अडचणींची दखल घेवून १ तारखेला आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यकतेनुसार मुख्य वितरिका देखील दुरुस्त करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाच्या सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.मागील आवर्तना प्रमाणे या आवर्तनात देखील लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आ.काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.अद्याप कोरोना विषाणूचे संकट टळलेले नाही.अजूनही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे आवर्तन सुरु असतांना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेवून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पाटबंधारे विभागाला सहकार्य करून आवर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे. दरम्यान रब्बी पिकांना सिंचनासाठी वेळेवर आवर्तन मिळणार असल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close