जाहिरात-9423439946
धार्मिक

श्री क्षेत्र वेळापूर येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वेळापूर येथे स्वामी शिवानंद गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा बुधवार दि.२७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न होत असल्याची माहिती अड्.भवर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

   

दरम्यान श्री क्षेत्र सुरेगाव येथे विठ्ठल-रुक्मिणी यांच्यासह अन्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठा श्री क्षेत्र मंजूर येथील महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरी यांच्या हस्ते संपन्न होत आहे.त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे प्रवचन संपन्न होत आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी हे विष्णू आणि लक्ष्मीचा अवतार मानला जात असून हा एक हिंदू देव दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे.जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो.तो विष्णू देवाचे रूप आहे.विठोबाला अनेकदा एका सावळा रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते,कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते.विठोबा हे मूलत: एकेश्वरवादी,गैर-विधीवादी भक्ती-चालित महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे.विठोबा मंदिर,पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे.विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी-संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते.वारकरी कवी-संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तीगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात.त्यांची मंदिरे आपल्या गावात असावी अशी प्रत्येक भाविकांची व गावकऱ्यांची इच्छा असते.त्यामुळे आपल्याला गावोगाव विठ्ठल मंदिरे दिसून येत असतात.कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र सुरेगाव येथे हि एक सुंदर मंदिर भाविकांनी लोकवर्गणीतून उभे केले असून त्यात विठ्ठल रुक्मिणी बरोबरच गोदावरी माता,श्री गणेश,शिव पार्वती,नंदी,राम सेवक हनुमान,राधाकृष्ण,वरून देव,अग्नी देव,संत ज्ञानेश्वर,भगवान शनेश्वर, आदी दैवताच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा प्रसिद्ध वेद संपन्न ब्राम्हणवृंदाच्या वेदघोषात व उच्चारात संपन्न होत आहे.

   दरम्यान या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा श्री क्षेत्र मंजूर येथील महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरी यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे प्रवचन संपन्न होत आहे.

   सदर कार्यक्रमाची सांगता गुरुवार दि.२८ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न होत आहे.त्या निमित्ताने सात दिवस राज्यातील प्रसिद्ध किर्तनकारांची कीर्तन सेवा भाविकांनी दिली जाणार आहे.त्यात ह.भ.प.निवृत्ती महाराज चव्हाण यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

   सदर प्रसंगी परंपरागत चालत आलेल्या रितिरिवाजाप्रमाणे गोफ विणने,देवीच्या काठीची मिरवणूक व भव्य यात्रा महोत्सव संपन्न होत आहे त्याचा सुरेगाव आणि परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close