गुन्हे विषयक
‘ती’ अपहारीत रक्कम १ ते १.२५ लाख ! कोपरगाव शहरात खळबळ

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभागातील ठेकेदारीवर काम करणारा संगणक कर्मचारी गत पंधरा दिवसापासून नगरपरिषदेतील रक्कम करून फरार झाला होता.त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्याने त्याच्या घरी जाऊन शिमगा केल्यावर त्याचा स्फोट झाला होता.मात्र त्या बाबत ‘जनशक्ती न्यूजसेवा पोर्टल’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर काल दुपारी तिनच्या सुमारास काही माजी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती करून सदर रक्कम भरण्याचा निर्णय घेतला असून प्रमुख अधिकारी उद्या आल्यावर एक ते सव्वा लाख रुपये भरले जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.त्या बाबत विघ्नेश्वर चौकानजीक नैऋत्येस असलेल्या एका व्यापारी आस्थापनात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला आहे.
सदर रक्कम एकढी मोठी नाही.ती २४-२५ हजार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले होते.काल बातमी प्रसिद्ध झाल्यावर कोपरगाव शहरातील सत्ताधारी गटातील व ईशान्य गडाशी संबंधित काही माजी पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून त्यात हि रक्कम किमान १ ते १.२५ लाख असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे सदर अधिकारी काहीतरी लपवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेत डिसेंबर २०२१ पासून ‘प्रशासक राज’ सुरु आले आहे.तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा कालावधी डिसेंबर २०२१ मध्ये संपला आहे.त्यांच्या कालखंडात बऱ्यांपैकी प्रतिबंध झाला असल्याचे दिसून आले होते.त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेत पदाधिकारी व नगरसेवक यांना ‘न भूतो’ असा ‘साग्रसंगीत’ निरोप देण्यात आला होते.त्यानंतर पालिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘प्रभारी राज’ आले होते.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे नगराध्यक्ष यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला गेला होता.यामुळे शहरातील विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक राहिला नसल्याचे उघड होत आहे.विविध विभागात बेदिली माजली आहे.कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही.त्यातून अनेक गैरप्रकार वाढीस लागले आहे.अशीच आरोग्य विभागातील घटना नुकतीच उघड झाली होती.त्यावर आमच्या प्रतिनिधीने प्रकाश झोत टाकला होता त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
कोपरगाव आरोग्य विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असून त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून काही कर्मचारी हे ठेकेदारीवर भरलेले आहे.त्यातील एक वादग्रस्त कर्मचारी हा कर्मवीरनगर या उपनगरातील रहिवासी आहे.तो कर्मचारी गत पंधरा दिवसापासून कामावर आलेला नव्हता.तो फरार झाला असल्याने आरोग्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेठीस धरले होते.त्यामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी हैराण झाले होते.तो का फरार झाला आहे.याचा शोध घेतला असता त्याने आपल्या कडे आलेली ‘सक्सेन पंपा’ची सुमारे १ ते १.२५ लाख रुपयांची रक्कमच (दहा ते बारा नव्हे) नगरपरिषदेच्या खात्यात भरलेली नाही असे निदर्शनास आले आहे.हि रक्कम ९८ पावत्यांची असल्याचे बोलले जात आहे.त्याच्या या बेताल वागण्याने वरिष्ठ अधिकारी संतापले असून दि.२५ सप्टेंबर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचे घर गाठले होते.व त्या ठिकाणी त्यांच्यात गल्लीत उभे राहुन मोठा ‘अकाली शिमगा’ केला होता.त्यामुळे हा विषय वाऱ्यासारखा गल्लीत आणि गल्लीतून गावभर पसरला होता.
दरम्यान या कोलाहलात त्या कर्मचाऱ्याच्या घरचे लोक आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्यात वादावादी झाली होती.त्यांनी आमच्या मुलावर विनाकारण आरोप लादून त्याला बदनाम करत असल्याचा आरोप केला होता.या संबंधी आमच्या प्रतिनिधीने संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचा घटनेला दुजोरा दिला होता.मात्र सदर रक्कम एकढी मोठी नाही.ती २४-२५ हजार असल्याचे सांगितले होते.काल बातमी प्रसिद्ध झाल्यावर कोपरगाव शहरातील सत्ताधारी गटातील काही माजी पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून त्यात हि रक्कम किमान एक ते सव्वा लाख असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे सदर अधिकारी काहीतरी लपवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान संबंधित आर्थिक गैरव्यवहार करणारा इसम कापड बाजारातील पती-पत्नीने नगराध्यक्ष पद भुषविलेल्या पदाधिकाऱ्याकडे गेला होता.त्यात एक माजी स्वीकृत नगरसेवक,एक मागासवर्गीय माजी नगराध्यक्ष माहिलेचा पती,गत निवडणुकीत पराभूत माजी नगरसेवक आदींनी तातडीची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला आहे.त्यामुळे हा गैरव्यवहार झाला यात कुठलीही शंका राहिलेली नाही.सदर गैरव्यवहारातील रक्कम या प्रकरणात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकांची वळवून घेऊन हा व्यवहार पूर्ण केला जाणार असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे दि.२७ सप्टेबर रोजी प्रशासनाचे प्रमुख अधिकारी व पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.