जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मुलाचे अपहरण,कोपरगावात गुन्हा दाखल,खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीतून गोदावरी उजव्या कालव्याच्याजवळून आपला दहा वर्षीय मुलगा साई सोमनाथ माळी याचे अज्ञात इसमाने अपहरण केले असून त्याचा शोध घेऊनही तो मिळून न आल्या प्रकरणी त्याच गावातील फिर्यादी महिला कविता सोमनाथ माळी (वय-३०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात मुलींच्या अपहरणाचा घटनात मोठी वाढ झाली आहे.बऱ्याच वेळा शोध घेऊनही ते मिळून येत नाही नाईलाज म्हणून मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करावा लागत आहे अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी कालव्या लगत रहिवासी असलेल्या पालकांवर आली आहे.

चासनळी येथील फिर्यादी महिला व मुलाची आई कविता माळी यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात इसमाने दि.०६ जुलै रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास आपल्या मुलगा साई माळी यास आपल्या कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याचे म्हटले आहे.त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही.या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२७३/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ या कलमा प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close