जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक अल्पवयीन मुलगी पळवली,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरा नजीक असलेल्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मनाई वस्ती येथे रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलगी (वय-१७) हिला ती आज पहाटे ०१.३० वाजेच्या सुमारास सौचालयास जाते म्हणून सांगून गेली ती परत घरी आलीच नाही तिला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने पळवून नेले असल्याची फिर्याद तिच्या पित्याने (वय-३८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संवत्सर मनाई वस्ती येथील मुलीच्या पित्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,आपण संवत्सर हद्दीत मनाई वस्ती येथे रहिवासी असून त्या ठिकाणी आपल्या पत्नी आणि मुले अशा कुटुंब कबिल्यासोबत राहतो.मंगळवार दि.०२ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास आपली अल्पवयीन सतरा वर्षीय मुलगी आपल्याला,”सौचालयास जाते” असे सांगून निघून गेली ‘ती’ घरि परतलीच नाही.कुणी तरी अज्ञात व्यक्तीने तिला अज्ञात कारणामुळे पळवून नेले आहे.

अल्पवयीन मुली पळून किंवा पळवून नेण्याचा घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मनाईवस्ती येथे घडली आहे.त्यामुळे संवत्सर मनाई वस्ती परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मुलीच्या पित्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,आपण संवत्सर हद्दीत मनाई वस्ती येथे रहिवासी असून त्या ठिकाणी आपल्या पत्नी आणि मुले अशा कुटुंब कबिल्यासोबत राहतो.मंगळवार दि.०२ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास आपली अल्पवयीन सतरा वर्षीय मुलगी आपल्याला,”सौचालयास जाते” असे सांगून निघून गेली ‘ती’ घरि परतलीच नाही.कुणी तरी अज्ञात व्यक्तीने तिला अज्ञात कारणामुळे पळवून नेले आहे.अशी फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनीं घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करित आहेत.या घटनेने कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close