जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात चार दिवसात तीन आत्महत्या !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत रहिवासीं बाळासाहेब सुखदेव वाकचौरे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून चार दिवस उलटत नाही तोच आज सकाळी दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत किशोर काशीनाथ वलटे (वय-४५) यांनी सात वाजे पूर्वी विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा सम्पवली आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरात सुभद्रानगर परिसरात एका उच्च शिक्षित महिलेने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असून ही आत्महत्या तिसरी ठरली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.कोपरगाव तालुका व शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

या प्रकरणी त्यांच्यावर उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.दरम्यान मृत व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाऊन हे कृत्य केल्याची सदर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

तर सुभद्रानगर येथील घटनेत सदर मयत महिलेवर श्रीरामपूर येथे मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.त्यातून ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण बारा कि. मी.अंतरावर जुना मुंबई-नागपूर राज्य मार्गालगत दहिगाव बोलका गाव असून या ठिकाणी मयत इसम आपल्या कुटुंबासह रहात होता.आज दि.२२ ऑक्टोबर सकाळी त्यांचे कुटुंबीय सात वाजेच्या सुमारास उठले असता त्यांना मयत किशोर वलटे यांनी विषारी औषध घेतल्याचे लक्षात आले.त्यांनी त्यांना तातडीने उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

त्यांच्या मृत्यूला कारण झालेले औषध नेमके कोणते व त्यांनी ते का घेतले याचे कारण समजू शकले नाही.त्यांच्या पच्छात आई,पत्नी,मोठा भाऊ,एक मुलगा,तीन विवाहित मुली असा परिवार आहे.

त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४७/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

दरम्यान दुसऱ्या घटनेतकोपरगाव शहराच्या ईशान्येस तीन कि.मी.अंतरावर असलेल्या ईशान्य गडावर प्राध्यापक व उत्तर सुभद्रानगर परिसरात रहिवासी असलेल्या इसमाच्या पत्नीने (वय अंदाजे-३८) आज आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.संबंधित इसम आपल्या कर्तव्यावर गेल्यावर संबंधित महिलेने आपल्या कोपरगाव शहरातील जवळच्या नातेवाईकांना एक लघुसंदेश पाठवून,” आपल्या मुलींचा सांभाळ करावा”असे सांगितले.त्यांनी तो संदेश पाहून तिच्या घराकडे धाव घेतली दरवाजा वाजवला मात्र आतून प्रतिसाद दिला नाहीं.अखेर मयत महिलेच्या पतीस कामावरून बोलावून घेण्यात आले.व दरवाजा उघडला असता तो पर्यंत उशीर झाला होता.सदर महिला गळफास घेतलेल्या आढळून आली होती.जवळच्या नातेवाईकांनी तातडीने उपचारार्थ खाजगी दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या महिलेला मृत घोषित केले आहे.या घटनेस कोपरगाव शहर पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.सदर महिलेवर मानसिक उपचार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.त्यातून ही दुर्दैवी घटना घडल्याचे कोपरगाव शहरात बोलले जात आहे.सदर महिलेच्या मागे पती,दोन मुली,सासू,सासरे असा परिवार आहे.

त्याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्य नोंद क्रं.५४/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद शहर पोलिसांनी केली आहे.

या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close