कोपरगाव तालुका
..त्या मुलींच्या अपघाताबाबत दोघांवर गुन्हा दाखल
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/05/images-2020-05-29T185739.755.jpeg)
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या समृद्धी महामार्गाचे कामावर महावितरण कंपनीच्या विद्युत तारा खाली आलेल्या असतानाही त्याच्या धोक्याचा फलक लावून कुठलीही सूचना न देता व प्रतिबंधात्मक उपाय न करता बे-जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडून दि.२४ मे रोजी दोन अल्पवयीन मुलींच्या अपघातास कारण घडलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन अधिकाऱ्या विरुद्ध आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यातील आरोपी नं.1 व 2 यांनी त्यांचे नियंत्रणाखाली चालु असलेल्या जेऊर कुंभारी शिवारातील वसंतराव आव्हाड यांचे शेताजवळ समृध्दी महामार्गाचे रस्त्याचे इतके उंचावर काम चालु असताना त्या भागात ईतर लोक गेल्यास त्यांना धोका पोहचु शकतो किंवा त्यांचे जिवीताची हानी होवु शकते हे माहीती असताना सुध्दा सदर ठिकाणी कोणताही सुचना/माहीती दर्शवणारा बोर्ड/फलक लावलेला नाही तसेच कोणताही सुरक्षा रक्षक नेमेला नाही.बॅरीगेटींग तारकम्पाऊंड केलेले नाही.रोडचे मधोमध इले.तारा गेलेल्या असुन इले.तारास कोणाचाही सहज हात लागुन मृत्यु होवु शकतो हे माहीती असतानाही इतक्या अंतरापर्यत माती टाकुन ठेवलेली आहे व इले.ताराची कोणतीही काळजी घेतलेली नाही त्यावर विजरोधक आवरण टाकलेले नाही म्हणुनच वरील ता.वेळी व ठिकाणी फिर्यादीची मुलगी 1) धनश्री गणेश पालवे व 2) मावशीची मुलगी प्रतिज्ञा नितीन आव्हाड वय 9ाा वर्षे अशा तारेखालुन येत असताना पाय घसरुन इले.तारेवर जावुन शॉक लागुन ठिकठिकाणी भाजुन गंभीर जख्मी होवुन जागीच मयत झालेल्या आहेत वगैरे मााचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि.दाखल केला आहे.