जाहिरात-9423439946
सहकार

सहकार वाचविण्यासाठी एफ.आर.पी.दरवाढ गरजेची-…यांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सगळया उद्योगापुढे स्पर्धा निर्माण झाल्या आहेत,त्यात साखर उद्योगही मागे नाही मात्र सहकारासमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे तेंव्हा केंद्र व राज्य शासनाने सहकार व त्यावर अवलंबुन असणारे ग्रामिण अर्थकारण टिकविण्यांसाठी एफआरपी अगोदर तातडीने साखरविक्री दरात व इथेनॉल,सहवीज निर्मिती खरेदी दरात वाढ करावी असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

यावेळी संचालक निलेश देवकर व सोनल देवकर यांचा बिपिन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला आहे.

“सहकाराला अनेक बंधने आहे तसं खाजगी कारखानदारीला नाही.त्यामुळे अनेक जटील प्रश्न निर्माण होत आहेत.भविष्यात साखर उद्योगासह सहकाराला प्रगतीच्या दिशेने घेवुन जातांना केंद्र व राज्य शासनाला अनेक कटु निर्णय घ्यावे लागतील.तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनांने साखर उद्योगाचा अभ्यासक गेला त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या उत्कर्षासाठी सातत्यांने काळानुरूप पावले उचलत काम केले होते”-बिपीन कोल्हे,संजीवनी उद्योग समूह.

    सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाची सांगता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे,संचालक निलेश देवकर,सोनल देवकर या उभयतांच्या हस्ते शनिवारी झाली त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

   सदर प्रसंगी संचालक विश्वास महाले,अरूण येवले,पांडुरंग शिंदे,माजी सभापती शिवाजी वक्ते,कोपरगाव पालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान,संजय होन,प्रदिप नवले,राजेंद्र कोळपे,बापूसाहेब बारहाते,बाळासाहेब वक्ते,ज्ञानदेव औताडे,रमेश आभाळे,आप्पासाहेब दवंगे,मनेष गाडे,ज्ञानेश्वर होन,विलास वाबळे,विलास माळी,त्रंबक सरोदे,रमेश घोडेराव,संजय औताडे,बाळासाहेब पानगव्हाणे,निवृत्ती बनकर,सतिष आव्हाड,सीईओ शिवकुमार,गणेशचे संचालक नानासाहेब नळे,संपत हिंगे,बाळासाहेब चोळके,बाबासाहेब डांगे,कार्यकारी संचालक जी.बी.शिंदे,बाजार समितीचे अध्यक्ष साहेबराव रोहोम,शिवाजी कदम,विजय रोहोम,माजी सरपंच राजेंद्र सांगळे,चंद्रभान रोहोम, संदीप चव्हाण,अशोक औताडे,फकिरराव बोरनारे,जयराम गडाख,वाल्मीक भास्कर,संभाजी बोरनारे,संभाजी गावंड,हरिभाऊ लकडे,अशोक भाकरे,दिपक गायकवाड,भिमा संवत्सरकर,माजी सभापती सुनिल देवकर,संदिप देवकर,पुंजाहरी राउत,वैभव गिरमे,रामदास चौधरी,रावसाहेब जाधव,यादव संवत्सरकर,बापु परजणे,डॉ.विजय काळे,राजेंद्र परजणे,महेश परजणे,वाल्मीक भिंगारे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक,खातेप्रमुख,उपखातेप्रमुख,उस उत्पादक सभासद,उसतोडणी मजुर,कंत्राटदार,अमृत व सुवर्ण संजीवनी शुगर ट्रान्सपोर्ट कंपनीचे सर्व उस वाहतुकदार,चालक मालक बहू संख्येने उपस्थित होते.

    यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर उद्योगाचा सुमारे १० हजार कोटींचा आयकर माफ करून हा उद्योग ख-या अर्थाने वाचविला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांसाठी त्या त्या कारखान्यावर शासकीय काटे उभारण्याची घोषणा केली त्याचे आम्ही स्वागत करून अभिनंदन करतो त्यांनी याबाबत ऑनलाईन मॉनेटेरींगसाठी पुढाकार घेवुन दिलासा द्यावा लागणार आहे.माजी मंत्री कोल्हे यांनी विदेशातील साखर उद्योगाचा अभ्यास करून
देशात सर्वप्रथम आत्मनिर्भरतेचे पाउल टाकुन सहकारातील सहवीज निर्माती,ज्युस पासुन इथेनॉल,विविध रासायनीक उपपदार्थ,औषध निर्माती,बायोगॅस पासुन सहवीज निर्माती,हायड्रोजन उर्जा,बायो सीएनजी,पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्मातीसह अनेक पायलट प्रकल्पांचा पाया घालत यशस्वी करून दाखविले व आगामी दहा वर्षात निर्माण होणा-या साखर उद्योगातील स्थित्यंतराचा मुकाबला करण्यासाठी संजीवनीला सज्ज केले होते.आगामी काळात यात निर्माण होणा-या आव्हानांचा मुकाबला कसा केला पाहिजे यासाठी देशातील साखर कारखानदारीला आधुनिकीकरणाची दिशा देत ग्रामिण अर्थकारण व त्यावर अवलंबुन असणारा उस उत्पादक सभासद शेतकरी,छोटया मोठ्या घटकांच्या उत्कर्षासाठी काम केले पाहिजे.त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत कारखान्यांने साखर उद्योगातील अनेक पायलट प्रकल्प अंगीकारत कठीण प्रसंगावर मात करत संघर्षातुन समृध्दी निर्माण करण्यासाठी गेल्या ६५ वर्षात काम केले.वर्तमानात अनेक कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमता वाढविल्यांने साखर हंगाम कालावधी कमी कमी होतांना दिसत आहे त्यातुन जीवघेणी स्पर्धा उत्पन्न होत आहे,साखर उद्योग सहा महिने चालला तर त्यावर अवलंबुन असणारे घटक टिकतील अन्यथा त्यांची कापड उद्योगाप्रमाणे वाताहात होईल,हरित क्रांती,धवल क्रांती झाली तेंव्हा आता उस क्रांती व्हावी असेही ते शेवटी हणाले आहे.

    सदर प्रसंगी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी प्रास्तविक केले त्यांनी,”सन – २०२५.२६ गाळप हंगामाची माहिती देत अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिकीकरणाची पावले उचलत नाविन्याचा ध्यास आत्मसात करत सहकारमहर्षी कोल्हे कारखाना बरोबरच संजीवनी युनिट नं.२ (रानवड) चे ही यंदा यशस्वी गाळप केले असे ते म्हणांले आहे.

   यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आहे तर सुत्रसंचलन संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले आहे तर
शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close