जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’ आंदोलनाबाबत कोपरगावात झाला हा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगाव येथे देखील मराठा समाजाच्या वतीने,’आमरण उपोषण’ सुरु असताना नुकतीच खा.सदाशिव लोखंडे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी या आंदोलनांची दखल घेवून त्यांना आश्वासन दिले असताना जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या आंदोलनाला तातडीने भेट देऊन,”त्यासंबंधी आपले सरकार केंद्र सरकारकडे कायदेशीर पाठपुरावा करील” लेखी देऊन महंत रमेशगिरीजी महाराज यांचे हस्ते लिंबू पाणी देऊन आंदोलनकर्ते अड्.योगेश खालकर,अनिल गायकवाड,विनय भगत आदिनीं आपल्या आंदोलनाचा समारोप केला आहे.त्यामुळे मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

“राज्य शासन मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहे.सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे यासाठी कायदेशीर बाजू अभ्यासपूर्णरित्या मांडण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे अशी प्रामाणिक इच्छा आहे”-राधाकृष्ण विखे,महसूल तथा पालकमंत्री,महाराष्ट्र राज्य,

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुटले असताना कोपरगावात मराठा समाजाच्या वतीने अड्.योगेश खालकर,अनिल गायकवाड,विनय भगत आदीं कार्यकर्त्यानी,’आमरण उपोषण’ सुरु केले होते त्याचा काल पाचवा दिवस असताना त्या आंदोलनाला पाठींबा वाढत असताना दिसून आला असला तरी आंदोलनकर्त्यांनी प्रकृती खालावली असल्याचे निष्पन्न झाले होते.त्या आंदोलनाचा समारोप करण्यासाठी आधी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते.मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आधी आपल्या यंत्रणेमार्फत आंदोलनकर्त्यांचा अंदाज घेतला होता व त्याचा अहवाल महसुल यंत्रणेने दिला होता.त्यानंतर आगामी निवडणुकात पक्षाला फटका बसण्याची शक्यता असल्याने त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून जरांगे यांचे आंदोलन संपुष्टात आणल्याने आगामी रस्त्यात कुठलाही काटा नको याची  दक्षता भाजप घेत असून त्यानुसार हे आंदोलन संपविण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

“राज्य शासनाकडे उचित कारवाईसाठी आपल्या मागण्या पाठविण्यात आल्या आहेत त्यामुळे आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे” अशी विनंती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केली होती;त्यानंतर अड्.योगेश खालकर व त्यांच्या सहकारी उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी आ.कोल्हे,जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,तहसीलदार संदीपकुमार भोसले,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,ऍड.शंतनू धोर्डे,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,राजेंद्र जाधव,विकास आढाव,दत्ता काळे,कैलास जाधव संदीप देवकर,कृष्णा आढाव,मुकुंद इंगळे,प्रशांत वाबळे,मनोज नरोडे,हिरालाला महानुभव,विरेन बोरावके,मनोज कडू,बाळासाहेब रुईकर,मंदार पहाडे,बबलू वाणी,भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर,शैलेश साबळे,सचिन सावंत,अमित आढाव,माजी बांधकाम सभापती जनार्धन कदम,सुनील देवकर,वैभव आढाव,गणेश सानप,गणेश नागरे,शरद गरुड,अक्षय आग्रे,वाल्मिक लहिरे आदी उपस्थित होते.

सदर प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री विखे बोलताना म्हणाले की,”राज्य शासन मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहे.सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे यासाठी कायदेशीर बाजू अभ्यासपूर्णरित्या मांडण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे अशी प्रामाणिक इच्छा आहे.त्यामुळे उपोषणकर्त्यांनी विनंती मान्य करावी व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती मंत्री विखे यांनी शेवटी केली आहे.

दरम्यान अ.नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शासनाकडे उचित कारवाईसाठी आपल्या मागण्या पाठविण्यात आले असल्याचे सांगितले असल्याचे सांगून उपोषणकर्त्यांना,”आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे अशी विनंती केली होती त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close