जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

सत्ताधाऱ्यांनी आकारी पडीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
   निवडणुका आल्यावर शेतकऱ्यांचा पुळका दाखविणाऱ्या नेत्यांपेक्षा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नास बांधील असून त्या आकारी पडीत शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही” असा इशारा  शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनीं नुकताच श्रीरामपूर येथे बोलताना दिला आहे.

 

अ.नगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी महसूलमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेला असताना त्यांनी,’पिंडाला कावळा शिवत नाही’तसा या प्रश्नाला स्पर्श केलेला नाही व या शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही.वर्तमान कालखंड त्याला अपवाद नाही.सत्तेत असताना मौन पाळायचे व सत्ता गेली की शेतकऱ्यांचे प्रश्नावर गळे काढायचे असा शिरस्ता उत्तर नगर जिल्ह्यातील सहकारातील नेत्यांनी सातत्याने सुरु ठेवला आहे.त्यामुळे हे आंदोलन होत आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”तत्कालीन इंग्रज सरकारने मुंबई सरकारच्या गॅझेट दि.०१ ऑगष्ट १९१८ अनव्ये १९१८ कलम-१ अनव्ये मुंबई सरकारचे सचिव ए.एफ.एल.बरणे यांनी तत्कालीन गव्हर्नरच्या आदेशाने वडाळा महादेव,मुठे वाडगाव,माळ वाडगाव,खानापूर,ब्राम्हणगाव वेताळ,शिरसगाव,उंदीरगाव,निमगाव,खैरी आदी  ०९ गावांची जमीन गॅझेट क्रं.७८८४ दि.०१ ऑगष्ट १९१८ अन्वये जमीन सुधारणा करून शेतकऱ्यांना पुन्हा परत करण्याच्या उद्देशाने विना मोबदला भूसंपादन केली होती.व ती पुढे भंडारदरा धरण झाल्यावर बेलापूर सिंडिकेट कंपनीस सन-१९२० च्या करारानुसार सुपूर्त केली होती.मात्र सदर कंपनी अवसायनात गेल्याने ती ०७ हजार एकर जमीन बेलापूर कंपनीस वर्ग केली होती.ती पुढे सरकारने सदर शेतकऱ्यांना परत केलीच नाही त्या साठी आजतागायत शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे.

  

  “आपण श्रीरामपूर मतदारसंघाचा आमदार या नात्याने आकारी पडीक शेतकऱ्यांच्या सोबत असून या प्रश्नाबाबत आपण पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला जाब विचारणार आहोत व तसेच तारांकित प्रश्नही करणार आहोत.शेतकऱ्यांना सत्तर वर्षात न्याय मिळाला नाही हे आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील मंत्र्यांचेही अपयश आहे”-आ.लहु कानडे,श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ.

अ.नगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी महसूलमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेला असताना त्यांनी,’पिंडाला कावळा शिवत नाही’तसा या प्रश्नाला स्पर्श केलेला नाही व या शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही.वर्तमान कालखंड त्याला अपवाद नाही.सत्तेत असताना मौन पाळायचे व सत्ता गेली की शेतकऱ्यांचे प्रश्नावर गळे काढायचे असा शिरस्ता उत्तर नगर जिल्ह्यातील सहकारातील नेत्यांनी सातत्याने सुरु ठेवला आहे.त्यामुळे शंभर वर्षाहून अधिक कालखंडात न्याय मिळू न शकलेल्या या प्रश्नाला थेट भिडण्याचे काम उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठाचे वकील व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी हाती घेतले आहे.त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आपले आंदोलन श्रीरामपूर येथे सुरु केले आहे.त्यास त्यांनी नुकतीच भेट दिली आहार.त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुकाध्यक्ष युवराज जगताप,डॉ.दादासाहेब आदिक,सुदाम आसने,शिवाजी गायकवाड,शरद आसने आदींसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”उच्च न्यायालयाने राज्य शासनाला याबाबत निर्णय घेण्यात सांगितले आहे.परंतु महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने याबाबत शासन स्तरावर कुठलाही निर्णय घेतला नाही तसेच आम्ही दोन वर्षापासून आत्मक्लेश आंदोलन,पदयात्रा,प्रत्यक्ष मंत्र्यांना भेटून वारंवार निवेदने दिली आहेत परंतु मंत्री महोदयांकडून आपण दीड महिन्यात आकारी पडितांचा प्रश्न निकाली काढून असे आश्वासन करून दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे.त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.त्यामुळे राज्य शासनाने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंच्याहत्तर  वर्षांनी तरी हा प्रश्न सोडवावा असं आवाहन करून आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आकारी पडीक शेतकऱ्यांना न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी सर्वात पुढे राहून शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा लढणार आहोत असा निर्धारही शेवटी अड्.अजित काळे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

दरम्यान यावेळी आंदोलनास शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर मतदार संघ प्रमुख प्रभाकर कांबळे,काँग्रेसचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक,प्रहारचे अ.नगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत पोटे,साहेबराव चोरमल,दिलीप औताडे,डॉ.नितीन आसणे,संजय शेजुळ,शैलेश वमणे,भागचंद औताडे,शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप,गोविंदराव वाघ,श्रीरामपूर बाजार समिती सदस्य सचिन गुजरसह तालुक्यातीलआदी पदाधिकारी सहकार्यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

उपोषणास बसलेले बाळासाहेब आसणे यांनी दि.१२ मार्च पासून अन्नाचा कणही घेतलेला नसल्याने त्यांची तब्येत खालावली असली त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याचा संभव व्यक्त होत आहे.परंतु याबाबत प्रशासनाने कुठल्याही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून तपासणी न करता आंदोलकांना वाऱ्यावर सोडले असल्याची माहिती आहे.

   सदर प्रसंगी आपल्या मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेने श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी किरण सावंत तसेच तहसीलदार वाघ यांना दिले असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close