जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

भारताच्या जडणघडणीत डॉ.आंबेडकरांचे मोलाचे योगदान-स्मरण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीय,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करून प्रत्यक्षात ते बदल घडवून आाणले.त्यामुळे आज प्रगतिशील भारत देश प्रत्यक्ष स्वरूपात दिसत असून आधुनिक भारताच्या या जडणघडणीत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त तालुक्यात विविध संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते आदींनी विविध ठिकाणी दुचाकी फेऱ्या काढून त्यांचे स्मरण केले आहे.तर धारणगाव येथील कार्यकर्त्यानी १३२ फूट विक्रमी फलक प्रसिद्ध करून डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले आहे.त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर आणि तालुका पोलिसांनी संवेदनशील मार्गात आपले बल प्रदर्शन केले आहे.

दरम्यान शहर आणि तालुक्यातील संवेदशील भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर आणि तालुका पोलिसांनी संवेदनशील मार्गात आपले बल प्रदर्शन केले आहे.दरम्यान शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी नेत्यांच्या प्रतिमा डॉ.आंबेडकरांपेक्षा मोठया रितीने झळकावून नेत्यांनी आपल्या सावल्या राष्ट्रीय नेत्यांपेक्षा मोठया असल्याचा अगोचरपणा केल्याचे आढळून आल्या आहेत याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून अनेकांनी यावर टीका केली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध समाजीक कार्यक्रम आयोजित केले होते.तर आ.काळे यांनी कोपरगाव येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष सुनील मोकळ,शहराध्यक्ष प्रकाश दुशिंग,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,दिनकर खरे,कृष्णा आढाव,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार,विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार,डॉ.तुषार गलांडे,चंद्रशेखर म्हस्के,विजय त्रिभुवन,शंकरराव घोडेराव, बाळासाहेब रुईकर,संदीप कपिले आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”डॉ.आंबेडकर हे एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते.त्यांनी त्यांच्या अलौकिक बुद्धीच्या व ज्ञानाच्या जोरावर अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले.त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे देशाच्या मध्यवर्ती ‘रिझर्व बँके’ ची स्थापना असून वीज निर्मिती आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी देशातील पहिला नदी-खोरे प्रकल्प तयार केला.जलनिती बरोबरच कामगार कल्याणाचे कायदे,औद्योगिकीकरण आणि त्यातून साधला जाऊ शकणारा देशाचा विकास यासाठी त्यानी अनेक योजना तयार केल्या. तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्तिनिशी जागा करून आत्मसन्मान,स्वाभिमान,अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून देवून हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केला असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close