जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची जगाला गरज-प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती.शोषण,भेदभाव,जातीभेदा विरोधी समतेची लढाई त्यांनी नुसती लढली नाही तर ती यशस्वी देखील करून दाखवली असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालु क्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

‘लिंगायत’ याचा अर्थ इष्टलिंग म्हणजे विश्वाच्या आकाराचे माणसाच्या डाव्या हाताच्या उंची इतके शिवाचे प्रतिक, आयत म्हणजे धारण करणे किंवा स्वीकारणे होय.लिंग धारण करणारा तो लिंगायत असा लिंगायत शब्दाचा अर्थ आहे. वर्ण,वंश,लिंग (स्त्री – पुरूष),जात,जन्म ठिकाण असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक स्त्री-पुरुषाला लिंग धारण करून लिंगायत होता येते.इष्टलिंग हे समतेचे व विज्ञानाचे प्रतिक आहे.महात्मा बसवेश्वरांनी इष्टलिंगाची निर्मिती करून समतावादी वीरशैव लिंगायत धर्म प्रचार व प्रसार १२ व्या शतकात केला होता.त्यांचे स्मरण आज त्यांच्या जयंती निमित्त केले जाते.

कोपरगाव तहसील कार्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आ.आशुतोष काळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, अमोल राजूरकर,प्रदीप साखरे,गिरीश सोनेकर,शिवकुमार सोनेकर,रोहित सरडे,अमोल साखरे,राहुल जंगम, शिवप्रसाद घोडके,सतीश नीळकंठ,संदीप सावतडकर,दिगंबर लोहारकर,दिगंबर भुसारे,गोपीनाथ निळकंठ,प्रमोद साखरे,किरण लड्डे,स्वाती कोयटे,मंगल सावतडकर,उज्वला सरडे,रजनी भुसारे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,माजी नगरसेवक विरेन बोरावके,राजेंद्र वाकचौरे,चंद्रशेखर म्हस्के,अशोक आव्हाटे,बाळासाहेब रुईकर,मुकुंद इंगळे,संदीप कपिले,धनंजय कहार, मनोज नरोडे आदींसह लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की,”महात्मा बसवेश्वरांनी माणसाला माणसाप्रमाणे वागवा.पशुहत्या करू नका,दया हाच धर्म आहे अशी शिकवण देवून स्त्रीला शुद्र,बहिष्कृत समजले जात असताना स्त्रीयांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य करून स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला व धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क मिळवून दिले असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक ओमप्रकाश कोयटे यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार विजय बोरुडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close