जाहिरात-9423439946
आंदोलन

राज्य परिवहन मंडळ भूतकाळात रममाण,मनसेचा संताप !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

औरंगाबाद शहराचे नामांतर गत महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने केले असून ते आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आले असले तरी राज्य परिवहन मंडळ अद्याप भूतकाळात वास्तव्य करत असून त्यांच्या तिकिटावर मात्र अद्याप औरंगाबादच असल्याने कोपरगाव शहर मनसेने या बाबत कोपरगाव बस आगाराचे कान उपटले असून सदर तिकिटावर, ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे अशी रास्त मागणी केली आहे.त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी सरकारने औरंगाबाद शहराच नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” देण्यास मंजुरी दिली आहे.याला बरेच दिवस उलटले आहे.यावर शासकीय स्तरावर अंमलबजावणी सुरु झाली आहे.मात्र राज्य परिवहन मंडळाच्या कागदोपत्री मात्र हा शासन निर्णय पोहचलेला दिसत नाही हे नुकतेच दिसून आले आहे.हि बाब,’कोपरगाव शहर मनसे’ने नुकतीच उघड केली आहे.त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

औरंगाबाद या शहराला औरंगाबाद हे नाव ‘औरंगजेब’ या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते.त्यापूर्वी या शहराचे जुने नाव खडकी होते.औरंगाबाद शहराचे नाव बदलून “संभाजीनगर” करण्याचा निर्णय सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात २९ जून २०२२ रोजी आणि तदनंतर १७ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव मंजूर झाले होते.

पुढे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी नरेंद्र मोदी सरकारने औरंगाबाद शहराच नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” देण्यास मंजुरी दिली आहे.याला बरेच दिवस उलटले आहे.यावर शासकीय स्तरावर अंमलबजावणी सुरु झाली आहे.मात्र राज्य परिवहन मंडळाच्या कागदोपत्री मात्र हा शासन निर्णय पोहचलेला दिसत नाही हे नुकतेच दिसून आले आहे.हि बाब,’कोपरगाव शहर मनसे’ने उघड केली आहे.’मनसे’ चे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल व तालुका गोदावरी कालवा समितीचे कार्यकर्ते तुषार विध्वंस यांनी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगारात प्रवेश करून छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) जाणारी बस पकडली होती व त्यात असणाऱ्या वाहकास त्यांनी,’छत्रपती संभाजीनगर’चे तिकीट मागितले असता त्यांनी कोपरगाव ते औरंगाबाद हे पूर्वीचे तिकीट फाडले होते.त्यावरून त्यांनी वाहकास धारेवर धरले आहे.व बस आगारास यावर कार्यवाही केली नाही तर ”मनसे’चे कार्यकर्ते आपल्या पद्धतीने आंदोलन करतील”असा इशारा दिला आहे.त्यांना बस मधील प्रवाशांनी साथ दिली आहे हे विशेष !

सदर प्रसंगी मनसेचे कार्यकर्ते सुनील फंड,मुन्नाभाई पाटणी,अनिल गायकवाड,तुषार विध्वंस संतोष गंगवाल,योगेश गंगवाल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close