आंदोलन
कोपरगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट,तक्रार दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वर्तमान कांदा खरेदित शेतकऱ्यांची व्यापारी मोठी लूट करीत असून देयके वेळेवर देत नसल्याचा आरोप शेतकरी मनेश नानासाहेब देवकर यांनी एका निवेदनाद्वारे बाजार समितीचे सभापती यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी मनेश नानासाहेब देवकर यांनी आपला कांदा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या अपेक्षेने विक्रीसाठी आणला होता.त्यांचा लिलाव येथील,’ओमसाई ट्रेडर्स’चे व्यापारी वक्ते यांनी १,१७३ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला होता.वास्तविक सदर कांदा खरेदी केल्यानंतर त्यांना चोवीस तासाच्या आत त्याचे देयक देणे गरजेचे होते.मात्र त्यांनी ते दिले तर नाही मात्र त्यांच्या गोदामात सदर कांदा खाली करताना त्यांनी सदर माल बदलला असल्याचा आरोप शेतकऱ्यांवर त्यास ७३ रुपये कमी करण्याचा प्रताप केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
कोपरगाव बाजार समितीने दि.०५ ऑगष्ट २०२० रोजी मोठे-मोठे ढोल बडवून मोठया उत्साहात सुरु केले होते.त्यात बाजार समितीने खुला कांदा व डाळींब खरेदी सुरु केली होती.त्यामुळे त्यास शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.त्यासाठी कोपरगाव,सिन्नर,येवला,वैजापूर,निफाड आदी तालुक्यातून शेतकऱ्यांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा महसुल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.गत सप्ताहात तर तब्बल सतरा हजार क्विंटल कांदा खरेदी झाली होती.शेतकऱ्यांना आपली वहाने उभी करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती.मात्र त्या नुसार सोयी सुविधा मात्र दिलेल्या जात नाही असा अनेक वेळ शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.
“या शेतकऱ्याबाबत बाबत आपण संबंधित व्यापाऱ्यासह अशा व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या असून त्यास सोमवारी हजर राहाण्यास सांगितले असून सदर शेतकऱ्याची रक्कम अदा करण्यास बजावले आहे.शिवाय व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची नियमित देणी न दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”-साहेबराव रोहोम,सभापती,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
दरम्यान आज दि.२२ जुलै रोजी अशीच घटना घडली असून कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी मनेश नानासाहेब देवकर यांनी आपला कांदा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या अपेक्षेने विक्रीसाठी आणला होता.त्यांचा लिलाव येथील,’ओमसाई ट्रेडर्स’चे व्यापारी वक्ते यांनी १,१७३ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला होता.वास्तविक सदर कांदा खरेदी केल्यानंतर त्यांना चोवीस तासाच्या आत त्याचे देयक देणे गरजेचे होते.मात्र त्यांनी ते दिले तर नाही मात्र त्यांच्या गोदामात सदर कांदा खाली करताना त्यांनी सदर माल बदलला असल्याचा आरोप शेतकऱ्यांवर करून त्यांची अडवणूक केली आहे.व त्यासाठी प्रतिक्विंटल ७३ रुपये कमी घ्यावे असा आग्रह सुरु केला व तरच आपण सदर कांद्याचा माळ खाली करू अशी अडवणुकीची भूमिका घेतली होती.व आपला कांदा माल लुटला गेला असल्याचा आरोप केला आहे.व कांदा पट्टी हि चार दिवसांनी मिळेल अशी अडेलतट्टूची भूमिका घेतली असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान कोपरगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची पट्टीसाठी अडवणुकीची भूमिका घेतली जात असून याकडे बाजार समितीचे लक्ष नाही असा आरोप केला आहे.कांदा खरेदी केल्यानंतर व्यापारी ५-८ दिवस कांदा पट्टी देत नाही असा आरोप करून अशा व्यापाऱ्यांचा परवाना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेवटी मनेश देवकर यांनी केली आहे.
दरम्यान त्यांनी आपल्या निवेदनाच्या प्रति आ.आशुतोष काळे,संजीवनीचे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व बाजार समीतीचे सचिव नानासाहेब रनशूर आदींना दिल्या आहेत.या घटनेने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.