दळणवळण
कोपरगाव तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाची नागरिकांना भरपाई

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून एन.एच.१६० हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे.या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना योग्य मोबदला देण्यात आला होता तथापि शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते.त्याबाबत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केलेला पाठपुरावा केला असून शासकीय जागेवर राहणाऱ्या तब्बल ४० नागरिकांना २ कोटी २ लाख ५६ हजार ५९८ रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील प्रकल्प बाधित नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास होते व ज्यांचे त्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु होते त्या जागा संपादित करण्यात आल्या होत्या मात्र त्या जागा सबंधित नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.यामध्ये देर्डे कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील अनेक नागरिकांचा समावेश होता तो आता मार्गी लागला असल्याचे मानले जात आहे.
कोपरगाव तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१६० जात असून या महामार्गामुळे प्रकल्पबाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना व अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनीचा व होणाऱ्या नुकसानीचा योग्य मोबदला देण्यात आला होता.मात्र जे नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास होते व ज्यांचे त्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु होते त्या जागा संपादित करण्यात आल्या होत्या मात्र त्या जागा सबंधित नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.यामध्ये देर्डे कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील अनेक नागरिकांचा समावेश होता.त्याबाबत या नागरिकांनी आ.काळे यांची भेट घेवून आम्हाला मोबदला मिळवून देण्याची मागणी केली होती.
याबाबत आ.काळे यांनी नगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,प्रातांधिकारी गोविंद शिंदे,एन.एच.१६० चे प्रकल्प संचालक श्री साळुंके यांच्याकडे पाठपुरावा केला होता.संबंधित नागरिक जरी शासकीय जागेवर राहत असले तरी एन.एच.१६० मुळे या नागरिकांचे हक्काचे घर व व्यवसाय हिरावले जाऊन या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली होती. राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१६० मुळे शासकीय जागेवरील ज्या नागरिकांचे घर, व्यवसाय बाधित झाले आहेत.त्या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे मुल्यांकन करून त्याप्रमाणात या नागरिकांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यांच्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशातून भरपाईपासून वंचित असलेल्या नागरिकांना २ कोटी २ लाख ५६ हजार मोबदला देण्यात आला आहे.
यामध्ये देर्डे कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील ४० नागरिकांचा समावेश आहे.या नागरिकांना भरपाई मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.