जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद शिक्षक मतदार संघ आणि त्या पाठोपाठ बारा जागांच्या विधानपरिषद निवडणुका यांनी लांबल्या होत्या मात्र आता त्या लवकरच संपन्न होणार असून आगामी काही दिवसात त्या झालेल्या असतील अशी माहिती शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना दिली आहे.त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या असल्यास नवल नाही.

इच्छुक तालुका प्रमुखांच्या आमच्या प्रतिनिधीने शोध घेतला असता या पातळीवर अनेक नावे पुढे आली आहे.त्यात संवत्सर येथील किरण खर्डे,सोनेवाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते धर्मा जावळे,गंगाधर रहाणे,संजय दंडवते,राजू शेख आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून त्यात शिवसेनेत प्रवेश करून माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली आहे.दरम्यान माजी खा.लोखंडे यांनी ऐनवेळी शिवसेना उबाठा गटाची प्रतारणा करून शिंदे सेनेचा हात धरला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने ऐन वेळी आपला सवता सुभा केल्याने व आपली स्वतंत्र गटाची व पदाधिकारी आदींची उभारणी केल्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब रहाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.तोही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी त्यामुळे ते शिंदे सेनेत जाणार हे ओघाने आले होते.त्यांचे कर्तेकरविते नितीन औताडे हे आधीच शिंदे गटात गेले होते.त्यामुळे त्यांचा रास्ता आधीच स्पष्ट झाला होता.त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा फिनिक्ष पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते.ते माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे  व उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आदींनी दोन पावले मागे जाऊन पेलले आहे.शहरातील आजी माजी पदाधिकारी आदींना एकत्र करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी पुन्हा एकदा त्यांची मोट बांधली असल्याने त्याचे इच्छित परिणाम लोकसभेला समोर आले आहे.व खा.भाऊसाहेब वाकचौरे मोठ्या मताधिकक्याने निवडून आले आहे.आता आगामी विधानसभा तोंडावर आल्याने पुन्हा एकदा ही मोट बांधणे गरजेचे झाले आहे.त्यासाठी शहराप्रमाणे संघटना बांधणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे पराभवाची बिळे बंद होण्याचे मार्ग सुकर होणार आहे.त्यासाठी नवीन कार्यकारिणी आवश्यक आहे.त्यासाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी केली असली तरी त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड होणे गरजेचे आहे.त्यासाठी निष्ठा महत्वाची आहे.प्रतिकूल काळात टिकून राहण्याची कसोटी त्यासाठी महत्वाचा गुण आहे.त्यात  पक्ष आणि पक्ष प्रमुख यांच्यावरील प्रेम महत्वाचे ठरणार आहे.त्यापातळीवर आमच्या प्रतिनिधीने शोध घेतला असता या पातळीवर अनेक नावे पुढे आली आहे.त्यात संवत्सर येथील किरण खर्डे,सोनेवाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते धर्मा जावळे,गंगाधर रहाणे,संजय दंडवते,राजू शेख आदीं शिवसैनिकांची नावे समोर आली आहे.

या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने उत्तर नगर जिल्ह्याचे प्रमुख रावसाहेब खेवरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी गत चार महिन्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या होत्या त्या आधी करणे गरजेचे होते.त्या पाठोपाठ विधानपरिषद शिक्षक मतदार संघ व त्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.परिणामी वरिष्ठ नेत्यांना त्यात गुंतून पडावे लागले होते.आता लग्नसराई जोरात सुरू आहे.त्यामुळे आमच्यासह सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते त्यात गुंतून पडले आहे.आगामी काळात सदर पदाधिकारी निवडी करण्यात येणार आहे.त्याबाबत कार्यवाही लवकरच होणार असल्याची ग्वाही दिली आहे.त्यास माजी जिल्हा प्रमुख कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे यांनीही दुजोरा दिला आहे.त्यामुळे नवोदित इच्छुकांच्या अपेक्षांना नवी चैत्र पालवी फुटली तर नवल नको.   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close