जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महाविद्यालयायीन तरुणीचा विनयभंग,आरोपीस पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 

   कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राहाता तालुक्यातील रहिवासी असलेल्या महाविद्यालयीन तरुणीचा शिर्डी येथील रहिवासी असलेल्या रिक्षा चालक आरबाज रमजान शेख याने विनयभंग केला असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.दरम्यान या आरोपीच्या विरुद्ध पोलिसांनी ऍट्रॉसिटी कायद्यांचे कलम लावल्याची माहिती मिळाली असून त्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

   

“शिर्डी येथील आरोपी अरबाज शेख याने दि.०२ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महाविद्यालयीन दोन तरुणी आपले महाविद्यालय संपल्यावर आपल्या घरी जाताना त्यांनी रिक्षा भाड्याने केली होती.त्या घरी जात असताना आरोपीने हा विनयभंगाचा उद्योग केला आहे.त्यास पोलिसांनी अटक केली असून त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.

भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो.कलम ३५४ आणि कलम ५०९ स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात.सदर गुन्हा हा नैतिक अधःपतनांशी संबंधीत मानला जातो.सदर कायदा हा स्त्रियांच्या हितासाठी आहे.तसा तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधीत आहे.म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तिशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून त्याकडे सार्वजनिक ठिकाणी पाळायची सभ्यता आणि नैतिकता याच्याशी संबंधीत आहे.या गुन्ह्यात तक्रारदार केवळ स्त्री असणे पुरेसे नसून घडलेली घटना ही सदर स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारी आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारी होती हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे.सदर गुन्हा हा दखलपात्र असून २ वर्षे सक्तमजुरी आणि रू.०२ हजार दंडाची शिक्षा आहे.अशी कायद्यात तरतूद असताना या गुन्ह्यात कमी आलेली नाही हे विशेष !
   अशीच घटना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यात फिर्यादी तरुणीने गुन्हा दाखल केला असून त्यात  म्हटले आहे की,”शिर्डी येथील आरोपी अरबाज शेख याने दि.०२ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महाविद्यालयीन दोन तरुणी आपले महाविद्यालय संपल्यावर आपल्या घरी जाताना त्यांनी रिक्षा भाड्याने केली होती.त्या घरी जात असताना आरोपीने हा उद्योग केला आहे.त्याने सदर रिक्षा हि मुंबई-नागपूर या जुन्या महामार्गाने वैजापूर रस्त्याने नेली होती व पुढे कोकमठाण शिवारात एका निर्जन स्थळी नेऊन रिक्षा थांबवून फिर्यादी तरुणीचे मनाविरुद्ध बळजबरीने तिचा हात पकडून तिला काटवनात घेऊन जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व तिचा विनयभंग केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या प्रकरणी तिने आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान या प्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.दरम्यान त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी विरुद्ध नुकताच दि.०२ एप्रिल मार्च रोजी रात्री उशिरा गु.क्रं. १६८/२०२४ भा.द.वि.कलम ३५४,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियंम १९८९ चे सुधारणा २०१५चे कलम ३(१) (डब्ल्यू)(१)(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान या प्रकरणी पुढील तपास नगर येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने हे करत आहेत.

दरम्यान आरोपीस शिर्डी पोलीस अधिकारी यांनी आरोपीस कोपरगाव येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.व आज त्यास न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान या घटनेचा कोपरगाव,राहाता तालुक्यातील पालकांनी निषेध व्यक्त करून आरोपीस कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close