
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १६ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०१ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी १३ स्राव पाठवले आहे.तेथून तपासणीत १६ रुग्ण बाधित आला आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून ०१ रुग्ण बाधित आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या १८ झाली आहे.तर आधी भरती असलेल्या २५ रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ७० हजार २९९ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १०६४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात शहर व ग्रामीण भागात अधिकची रुग्ण वाढ थांबली होती ती आता पुन्हा वाढली आहे.
तर ग्रामीण भागात ०९ रुग्ण आढळले आहे त्यात वारी येथील एक पुरुष वय-३२,रवंदे येथील दोन पुरुष वय-१४,६८ तर एक महिला वय-३७,करंजी येथे एक पुरुष वय-१४,महिला वय-३२,सोनारी येथीलपुरुष वय-४२,ब्राम्हणगाव दोन पुरुष वय-३०,३५, या रुग्णांचा समावेश आहे.तर त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढ कमी झाल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ८१६ इतकी झाली आहे.त्यात ६७ रुग्ण सक्रिय आहेत.त्यामुळे आज पर्यंत ४५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६० टक्के आहे.आतापर्यंत १९ हजार ५१२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७८ हजार ०४८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.४३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ७०६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९६.०९ टक्के झाला आहे.दरम्यान काल शहरी भागात आज रुग्ण वाढ थांबली असल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.