जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

कृषी यांत्रिकीकरण योजना,शेतकऱ्यांना…इतक्या कोटिंच्या औजारांचे वाटप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अनुदान तत्वावर कृषी विभागाकडून कृषी औजारे देण्यात येत असून त्यानुसार कृषी विभागाच्या प्रयत्नातून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात आला असून या योजनेच्या माध्यमातून ६.५० कोटी रुपयांचे औजारांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली असून जिल्ह्यात कोपरगाव तालुका आघाडीवर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“कृषी यांत्रिकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारांसाठी मोठी मागणी आहे.त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर लकी ड्रॉ द्वारे निवड होऊन शेतकऱ्यांना अनुदान वितरण केले जाते.सन २०२२-२३ या वर्षात कृषी विभागामार्फत सर्वाधिक कृषी यंत्र औजाराचे वाटप करण्यात आले आहे”-मनोज सोनवणे,प्रभारी तालुका कृषी अधिकारी,कोपरगाव.

कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप कोपरगाव तहसील प्रांगणात करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,नंदकुमार औताडे,प्रभाकर गुंजाळ,विठ्ठल जावळे,गणेश बारहाते,राजेंद्र औताडे,बाळासाहेब औताडे,भाऊसाहेब औताडे,बाजीराव होन,दत्तात्रय गांगवे,भारत रानोडे,नितीन पगार आदींसह लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी उन्नती योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे.यामध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग आहे.या योजने मध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”दिवसेंदिवस मजुरांची कमी होत असलेले संख्याबळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे कृषी यांत्रिकीकरणाला शेतकरी प्राधान्य देत असून आजची ती गरज झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे वळणे भाग पडले आहे.परंतु शेतमालाला खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे दैव देते आणि कर्म नेते अशी सातत्याने अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे.वाढलेले कृषी औजारांचे दर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही त्यामुळे गरजू शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे कृषी यांत्रिकीकरण योजना फायदेशीर आहे.

दरम्यान कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांचेवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात एका महिलेचा विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला असताना व शहरातील पोलिस निरीक्षक आणि काळे आणि कोल्हे या राजकीय नेत्यांबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधान केलेले असताना राजकीय नेते त्यांना अभय देत असून याबाबत कोपरगाव तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या व मिळणारे अनुदान यामध्ये मोठी तफावत आहे. हि तफावत दूर करून कृषी औजारे मिळण्यासाठी अर्ज केलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाने जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली आहे.त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून सुमारे ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारे शेतकऱ्यांना मिळाली असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close