जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात पावसामुळे खरिपाच्या फायद्याबरोबर नुकसानही

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी पावसाने नुकसान झाल्याचे चित्र झाले असून यात धारणगाव तीन घरे तर मळेगाव थडी एक घर,हिंगणी एक घरांचें नुकसान झाले पासून काकडीत पंधरा शेतकऱ्यांचे ३ हेक्टर १५ आर क्षेत्राचे नुकसान झाले आहे या शिवाय चांदेकसारे येथील १२ शेतकऱ्यांचे ५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून देर्डे-भरवस रस्त्यावर नविन पुलाचे काम सुरू असून वेळापूर गावाजवळील-ब्राह्मण नाला येथील पर्यायी सर्व्हिस रस्ता वाहून गेला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या पावसामुळे नुकसान धारणगाव तीन घरे तर मळेगाव थडी एक घर,हिंगणी एक घर,काकडी पंधरा शेतकरी ३ हेक्टर १५ आर क्षेत्र व चांदेकसारे १२ शेतकरी क्षेत्र ५ हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

देशात सप्टेंबरमध्ये या महिन्याच्या सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी आहे.सप्टेंबरमध्ये ही तूट काही प्रमाणात भरून निघेल असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.कोपरगाव तालुक्यात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांची निर्माण झालेली ओढ असल्या वेळेस पाऊस पडल्याने नेमकी भुक भागली असून खरीप पिके आता शतप्रतिशत येण्यास मदत मिळणार आहे.मात्र राज्यात कोपरगावसह काही ठिकाणी पावसामुळें नुकसान झाले आहे.

त्यात कोपरगाव तालुक्यातील देर्डे-भरवस रस्त्यावर असणारा व आता नविन पुलाचे काम सुरू असणारा वेळापूर गावाजवळील-ब्राह्मणनाला येथील पर्यायी सर्व्हिस रोड लगत असलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी सात वाजेपासून या सर्व्हिस रस्त्यावर पाणी असुन कमी अधिक प्रमाणात २ ते ३ फुट पाणी आले आहे.यामुळे लासलगाव कडुन शिर्डी कडे तसेच लासलगाव च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.रस्त्यावरून पाणी वाहत असताना वाहने चालवणे धोकादायक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम कोपरगाव उपविभागाचे प्रशांत वाकचौरे यांनी केले आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या पावसामुळे नुकसान धारणगाव तीन घरे तर मळेगाव थडी एक घर,हिंगणी एक घर,काकडी पंधरा शेतकरी ३ हेक्टर १५ आर क्षेत्र व चांदेकसारे १२ शेतकरी क्षेत्र ५ हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close