जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात…या शाळेत आंतरराष्ट्रिय योग दिवस उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूल येथे नुकतेच योगाचे धडे देण्यासाठी आंतरराष्ट्रिय योग खेळाडू व प्रशिक्षक आरती पाल यांना निमंत्रित करून योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता.सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका,इंग्लंड,चीन,फ्रान्स,रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता.सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका,इंग्लंड,चीन,फ्रान्स,रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली.२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.आता जगभर हा दिन उत्साहात साजरा करण्यात येत असून त्याचे आयोजन समता स्कूल येथे आरती पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

आरती पाल या सध्या श्री बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील पतंजली योग विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.आरती पाल यांनी हरिद्वार येथून समताच्या विद्यार्थ्यांना,पालकांना आणि शिक्षकांना योगाभ्यासाचे धडे दिले.यामध्ये त्यांनी सूर्यनमस्कार,भुजंगासन,शवासन,धनुरासन,श्वानासन,ताडासन , वृक्षासन,वज्रासन,शिशुपालासन आदी आसनाचे प्रात्यक्षिक दाखविले.आरती पाल यांनी केवळ या सर्व आसनांचे प्रात्यक्षिकच दाखविले नसून सर्व विद्यार्थ्याकडून हि आसने करवून घेतली.हा कार्यक्रम फेसबुक या सामाज माध्यमाव्दारे घेण्यात आला.आरती पाल यांनी योगासनाचे महत्व विशद केले.
समता इंटरनॅशनल स्कुलच्या मॅनेजींग ट्रस्टी स्वाती कोयटे यांनी आपल्या भाषणात योग हि जगाला भारताची देणगी आहे असे सांगितले तसेच नियमित योगा करण्याचे विविध फायदे विशद केले. त्यांनी असेही सांगितले कि योगा आपल्याला स्वत:ची ओळख करून देतो तसेच योगामुळे आपण आनंदी, प्रसन्न, शांत, संयमी,निरोगी राहतो व निसर्गाबरोबर एकरूप होतो.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले.पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर सत्कार प्राचार्या लीसा बर्धन यांनी आरती पाल यांचा शाब्दिक स्वरूपात सत्कार केला.सेकंडरी इनचार्ज शिल्पा वर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले तसेच क्रीडाशिक्षक उत्सव गांधी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close