कोपरगाव तालुका
सरकार न्यायालयाच्या निर्णयाची अंमल बजावणी करत आहे-अड्-बोरावके
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सदर प्रसंगी अड्.जयंत जोशी यावेळी म्हणाले, हा कायदा नेमका काय आहे हे अजून समाजातील अनेकानी समजवून घेतले नसल्याने हि परीस्थिती निर्माण झाली असून त्याची जनजागृती जनसामान्यात होणे गरजेचे आहे. कायद्याच्या विरोधात अपप्रचार करणार्यांना देखील प्रसंगी समजावून सांगू. सुधीर डागा म्हणाले,देशातील मुस्लीम बांधवाना देखील विश्वासात घेणे आवश्यक असून हा कायदा देश व नागरिकांच्या हिताचा आहे.
नागरिकत्व दुरुस्ती व एन आर सी कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरु असून त्यातून देशाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर या नागरित्व कायद्याच्या समर्थनार्थ कोपरगावात एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत मंगळवार दि .२४ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून कायद्याच्या समर्थनार्थ फेरी काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
त्यावेळी पुढे बोलताना ते बोरावके म्हणाले, “दंगली घडविणारे कोण याचा शोध घेतला पाहिजे. पंतप्रधान मोदीचे काम पाहून अनेकांना धडकी भरली आहे. या कायद्यानिमित्त विरोधी पक्षातील खदखद बाहेर पडत असून हिंदुस्तान म्हणजे काही धर्मशाळा नाही .विरोधक ,काही दूरचीत्रावाहिनी अपप्रचार करून देशाविरुद्ध षडयंत्र करीत आहे.यावेळी सुनील बंब ,सुशांत खैरे सह अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केले.