कोपरगाव तालुका
कर्मवीरांनी मानवीय संवेदनेचा अंगीकार केला-डॉ.सदानंद भोसले
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,शाहू महाराज,महात्मा गांधी,डॉ. आंबेडकर यांच्या वैचारिक प्रभावातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अहोरात्र संघर्ष करून गोरगरीबांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ रोजी करून समाजापुढे आदर्श स्थापित करण्याची संवेदना कर्मवीरांच्या अंगी होती असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.सदानंद भोसले यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
सदर प्रसंगी माजी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, लताताई शिंदे सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
रयत’ हे नाव कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी महाराज,रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘जन’ या संकल्पनेतून स्वीकारून त्यांनी दीन-दलित, बहुजनांना ज्ञानाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याची जाणीव डॉ.भोसले यांनी यावेळी करून दिली.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘रयत’ हे नाव कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी महाराज,रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘जन’ या संकल्पनेतून स्वीकारून त्यांनी दीन-दलित, बहुजनांना ज्ञानाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याची जाणीव यावेळी करून दिली.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य दिलीप दारुणकर,सुनील गंगुले, संदीप वर्पे,,पाचही शाखांचे शाखाप्रमुख श्री खैरनार, सुभाष दरेकर.सौ.सुरवसे, श्री काकळीज, प्राचार्य डॉ. थोपटे, महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. आर.जी.पवार, प्रा. रमेश झरेकर, डॉ. विजय निकम तसेच प्रा. डी.डी.सोनवणे यांचे सहकार्य लाभले.