जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…तर तुमचे पितळ उघडे करू -ठाकरे यांचा इशारा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यातील (माजी आ.कोल्हे यांच्या) कोणत्या संस्थेत काय उद्योग झाले याच्या फाईल माझे समोर आहे.तुम्ही थांबले नाही तर तुमच्यावर अनेक आरोप आहे असे सुतोवाच करून कुक्कुट पालन योजनेच्या अफरातफार झाले बाबत अप्रत्यक्ष सुतोवाच करून आम्ही तुमचे पितळ उघडे करू असा इशारा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व वर्तमानात काळे गटाचे समर्थक शिवाजी ठाकरे यांनी केल्याने आता नगरपरिषद निवडणुकीने अपेक्षित पण गंभीर वळण घेतले असल्याचे उघड झाले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शिवाजी ठाकरे व अन्य मान्यवर दिसत आहे.

“विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप हे अर्थहीन आहे.कोणतीही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हायला हवी असे वाटते.मात्र विरोधक विकासावर बोलत नाही.दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.विरोधकांच्या हातातून निवडणूक निसटली असल्याचे दिसत आहे. कोपरगाव शहरातील मतदार जाणकार आहे.संस्था चालवत असताना छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात”-कृष्णा आढाव,जिल्हाध्यक्ष,युवा राष्ट्रवादी काँग्रेस.

   महाराष्ट्रातील राजकीय पक्ष,नेते आणि कार्यकर्ते यांना झटका देणारा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असून त्यात त्यांनी ०३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी २१ डिसेबर पर्यंत पुढे ढकलली आहे.महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी संपल्या आहेत तर काही ठिकाणी अद्याप त्या सुरु आहेत.मात्र,नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचे आदेश दिला आहे.आता आपले नामनिर्देशनपत्र माघारीसाठी आज शेवटचा दिवस उरला असताना हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष,उमेदवार पुन्हा एकदा कामाला लागले असून या नगरपरिषदा मधील निवडणुकांचा शिमगा सुरू झाला असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत.कोल्हे गटाने अपेक्षेप्रमाणे आ.काळे गटावर वार सुरू केले आहे.एवढेच नाही तर न्यूजसेवा या वेब पोर्टलवर ओमप्रकाश कोयटे यांना काळे गटाने उमेदवारी जाहीर केल्यावर ही निवडणूक कोणत्या दिशेने जाणार आहे याचे सुतोवाच केले होते.व यात समता नागरी सहकारी पतसंस्था रडारवर येणार व चौकशीच्या फेऱ्यात अडकणार याचा अंदाज वर्तवला होता.आता तो खरा ठरत असून या बाबत भाजप (कोल्हे गटाने) समतावर वार सुरू केले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून संभाजीनगर येथील तक्रारदार डॉ.संजय चंद्रकांत मोरे यांच्या अर्जावरून पुणे येथील राज्याच्या सहकार आयुक्तांनी अहिल्यानगर येथील सहकार निबंधकांना पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.विशेष म्हणजे निवडणूक संपायच्या आत महाराष्ट्र सहकार कायदा कलम ८३ अन्वये अपर निबंधक डॉ.पी.एल.खंडागळे यांनी चौकशीची नोटीस (क्र.- ३०३६,दिनांक ०८/१२/२०२५) बजावल्याचे वृत्त आहे.त्यामुळे आता आ.काळे आणि कोयटे गट तिळमिळला आहे.आणि त्यांनी तातडीने आज साईबाबा तपोभूमी येथे सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करून याबाबत आरोपाला उत्तर देऊन तुम्ही हे केले तर आम्ही तुमच्या यशवंत कुक्कुट पालन सहकारी संस्थेची चौकशी करू असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

संबंधित सहकार आयुक्त यांनी जिल्हा सहकार निबंधक यांना कलम ८३ अन्वये पाठवलेले नोटीस आमच्या प्रतिनिधींचे हाती आली असून ती वाचकांसाठी दिली आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोल्हे गटाने ज्या आविर्भावात पत्रकार परिषद घेतली होती.त्यातून त्यांना आता आपला पराभव उघड दिसू लागला आहे.समता सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांची उमेदवारी आपल्यावर काळे विरोधक भयभीत झाली असल्याचे सांगितले आहे.आ.काळे यांनी शहराचे मूलभूत प्रश्न असलेल्या पाच क्रमांकाचे तलाव पूर्ण करून आपला शब्द पूर्ण केला आहे.अजूनही बाकी तलाव पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.आता विरोधकांना पराभव दिसू लागण्याचे ते बैचेन झाले आहे.पायाखालची वाळू घसरू लागली आहे.त्यामुळे कोर्ट कचऱ्याची पायरी त्यांना ओलांडावी लागली आहे.हे खोडा घालण्याचे पाप भाजपचे आहे.त्यांनी त्यातून सुटका करून घेण्यासाठी कोयटे यांची बदनामी सुरू केली आहे.एकाच महायुतीचे असताना तुम्ही टीका का करत आहे.कोपरगाव शहरासाठी तुम्ही किती निधी दिला याचे उत्तर देणे गरजेचे आहे.तालुक्यातील एखाद्या रस्त्याचे काम निकृष्ट होत असेल तर ती जबाबदारी आ.काळेंची नाही तर ती सामान्य माणसाची आणि विरोधकांची पण आहे.कोपरगाव तालुक्यातील कोणत्या संस्थेत काय उद्योग झाले याच्या फाईल माझे समोर आहे.तुम्ही थांबले नाही तर आम्हाला हे सर्व उघड करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,”संदीप कोयटे यांची सी.बी.आय.चौकशी झाली त्याचे क्लीन चिट दिली आहे.तुमच्यावर अनेक आरोप आहे असे सुतोवाच करून कुक्कुट पालन योजनेच्या अफरातफार झाले बाबत अप्रत्यक्ष सुतोवाच केले आहे.कोयटे यांचे काही थकीत कर्जदार चुकीचे बोलत असतील तर त्यांचेकडून वेगळी अपेक्षा करू शकत नाही.विरोधी नेत्यांच्या सहकारी संस्था आहे याचे भान त्यांनी ठेवणे गरजेचे आहे.तुम्ही काय दिवे लावले हेही जनतेला सांगा.उगीच चिखलफेक करू नये असे आवाहन त्यांनी शेवटी शिवाजी ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान संबंधित सहकार आयुक्त यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकार निबंधक यांना कलम ८३ अन्वये पाठवलेले नोटीस आमच्या प्रतिनिधींचे हाती आली असून त्याबाबत आमच्या प्रतिनिधींनी समता सहकारी पतसंस्थेचे महाव्यव्यवस्थापक सचिन भट्टड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप आम्हाला अशा प्रकारची नोटीस आली नसल्याचे सांगत सदर डॉ.संजय मोरे हे थकीत कर्जदार असल्याचे सांगून त्यांनी थकबाकी भरलेली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी नगरपरिषदेचे माजी गटनेते
विरेन बोरावके म्हणाले की,”सामाजिक संकेतस्थळाचा वापर करून आ.काळे यांची बदनामी सुरू आहे.लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे काम बंद करावे,नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत ३१ उमेदवारांचे बाजूने न्यायालयाचा निकाल लागून निवडणूक सुरू झाली.कोयटे यांचे वातावरण चांगले असताना ते जाणीवपूर्वक बिघडवले जात आहे.टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे गावाला दिशा देण्याचे काम आ.काळे करत आहे.पण या टीकेवर जनता विश्वास ठेवणार नाही.विरोधी पक्षाने विकासासाठी निवडून देणार आहे.

सदर प्रसंगी युवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष
कृष्णा आढाव म्हणाले की,”विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप हे अर्थहीन आहे.कोणतीही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हायला हवी असे वाटते.मात्र विरोधक विकासावर बोलत नाही.दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.विरोधकांच्या हातातून निवडणूक निसटली असल्याचे दिसत आहे. कोपरगाव शहरातील मतदार जाणकार आहे.संस्था चालवत असताना छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात.माजी मंत्री स्व.काळे कोल्हेंवर टीका केली नाही तर सामाजिक कार्य करताना गुन्हे सरकार दखल करतात.ते सांगत असताना त्याचा विपर्यास ही कोल्हे गटाचे विरोधक मंडळी करत आहे.

यावेळी दलीत कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांनी,” जितेंद्र रणशूर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी रणशूर यांनी प्रयत्न केले आहे.आ.आशुतोष काळे यांनी रणशूर यांना भरपूर दिले असताना असा आरोप केला आहे.
त्यांच्या नावाच्या चिठ्ठी काढण्यास टाकली होती.ती निघाली नाही.त्यात आ.काळे यांचा दोष नाही.ते काय करतात याची सर्व पत्रकारांना माहिती आहे येथे बोलण्याचा तो विषय नाही.असे बोलून त्यांच्यावर तिखट टीका केली आहे.त्यांनी आशुतोष काळे,ओमप्रकाश कोयटे यांच्यावर अभद्र टीका करू नये व यापुढे दलीत समाजात तेढ निर्माण करू नये.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी,” आ.काळे यांच्या विकास योजनेचे व कोयटे यांच्या सामाजिक कामांचे समर्थन केले आहे. तीस पस्तीस वर्षात कोयटे वरील खटले निकाली निघाले आहे.कोयटे यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे काम विरोधक करत आहे.बाकी पदाधिकारी यांनी जे विषय मांडले त्यांचीच पुनरावृत्ती करून डॉ.आंबेडकर पुतळा मैदानावर येण्याचे व जाबसाल करण्याचे थेट आव्हान गंगूले यांनी शेवटी दिले आहे.




  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close