जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात युवा पदाधिकाऱ्यांची पोलिसांशी हुज्जत,कारवाई बाबत प्रश्नचिन्ह !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात काल रविवार दि.१३ नोव्हेंबर रोजी बस स्थानक परिसरात पोलीस ठाण्यामधील कर्मचारी व अधिकारी गस्त घालत असताना बस स्थानक परिसरात आले असता दोन गटातील तरुणांत अज्ञात कारणाने वादंग सुरू होते यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना भाजपा युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्यांने मात्र पोलिसांशी हुज्जत घातली आहे.पोलीस समजून सांगत असताना सदर तरुणावर कुठलाही परिणाम न झाल्याने शहरात पोलिसांचा धाक राहिला का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्र.

याबाबत संबंधित संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीने बोलण्याचा प्रयत्न केला असता,पोलिस अधिकांऱ्यानी प्रतिसाद दिला नाही.एकीकडे सर्व सामान्य माणसाने जर काही केले तर पोलीस मोठा कारवाईचा बडगा उचलतात व कडक कारवाई करतात मात्र सार्वजनिक ठिकाणी या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याने एवढा गोंधळ घालून देखील पोलीस अधिकारी मौन पाळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यामुळे शहर पोलिसांच्या मनोधैर्यावर विपरीत परिमाण होऊ शकतो व असामाजिक तत्व उचल खाऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वर्तमानात शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे.चोरटे आणि बेताल तरुण यांच्यावर पोलिसांचा धाक राहिला नाही असे वारंवार दिसत आहे.त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकते.अशी स्थिती वारंवार ओढवताना दिसत आहे.अशीच घटना रविवार दि.१३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकावर घडली असल्याचे उघड झाले आहे.

रात्रीच्या सुमारास या बस स्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती.या ठिकाणी तरुणांच्या दोन गटात बराच वेळ वाद सुरू होता.याची कुणकुण शहर पोलिसांना लागल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्यांनी घटनास्थळी गेल्यावर सदर तरुणांना समजावणीच्या सुरात सांगून पाहिले मात्र त्याचा यत्किंचितही परिणाम त्यांच्यावर झाला नाही.त्यात राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.त्यास पोलीस अधिकाऱ्यांनी समजावून सांगूनही उपयोग न झाल्याने या ‘भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्याला’ पोलीसांनी आपल्या गाडीमध्ये घेऊन पोलिस ठाण्यात आणले,तरिही पोलीस ठाण्यामध्ये देखील या पदाधिकाऱ्याने आपली अरेरावी सुरु ठेवली होती हे विशेष !
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला असता,पोलिस अधिकाऱ्यानी प्रतिसाद दिला नाही.एकीकडे सर्व सामान्य माणसाने जर काही केले तर पोलीस मोठा कारवाईचा बडगा उचलतात व कडक कारवाई करता मात्र सार्वजनिक ठिकाणी या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याने एवढा गोंधळ घालून देखील पोलीस अधिकारी मौन पाळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यामुळे शहर पोलिसांच्या मनोधैर्यावर विपरीत परिमाण होऊ शकतो व असामाजिक तत्व उचल खाऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत पोलीस अधिकारी,कर्मचारी व असामाजिक तत्व यांच्याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close