कोपरगाव तालुका
राज्यातील पतसंस्था चळवळीला समता पतसंस्थेच्या योगदानामुळे बळकटी-गौरवोद्गार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत आहे.समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या योगदानामुळे बळकटी मिळाली असल्याचे गौरवोद्गार खा.सुजय विखे यांनी नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.
“समताच्या ६६१ कोटी रुपयांच्या ठेवी,४७५ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या कर्ज पुरवठ्यात १७५ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज व १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक या आधारे लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाअंतर्गत समता पतसंस्थेच्या १२.५० लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत”ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता नागरी सहकारी पतसंस्था.
नगर शहरात कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेच्या सावेडी येथील ‘प्रेमदान चौका’तील उपनगर शाखेचे उदघाटन नुकतेच मोठ्या उत्साहात खा.सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीं आमदार संग्राम जगताप हे होते.
सदर कार्यक्रमास आ.संग्राम जगताप,जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर,अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधीचे उपाध्यक्ष वसंत लोढा,प्रसिद्ध बँकिंग तज्ञ आर.डी.मंत्री,व्यंकटेश मल्टी स्टेटचे अध्यक्ष अविनाश शिंदे,जेष्ठ कॉंग्रेस नेते डी.एम.कांबळे,कायनेटिक कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत गुळवे जेष्ठ व्यापारी भालचंद्र क्षीरसागर,ट्रान्सपोर्ट व्यवसायिक शिवलिंग डोंगरे,टॅक्स कन्सल्टंट दत्तात्रय लोखंडे,प्रकाशजी हापसे आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसांगी पुढे बोलताना म्हणाले कि,”ज्या पतसंस्था अडचणीत आल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाही त्या पतसंस्थांवर फौजदारी कायद्यान्वये कठोर कारवाई केल्यास ठेवीदारांच्या ठेवी परत मिळु शकतील.त्या दृष्टीने कायद्यात बदल झाले पाहिजे.तसेच कोयटे परीवाराचे विखे परीवाराशी घट्ट नाते असल्याने मला या उद्घाटन समारंभासाठी यावे लागले असल्याचे विशद केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी करत्न ते म्हणाले की,” समताच्या ६६१ कोटी रुपयांच्या ठेवी,४७५ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या कर्ज पुरवठ्यात १७५ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज व १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक या आधारे लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाअंतर्गत समता पतसंस्थेच्या १२.५० लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत.या माध्यमांतून ९९.३५ टक्के ठेविदारांना संरक्षण देण्यास समता पतसंस्था यशस्वी झाली आहे.तसेच सहकारी पतसंस्थांमधील ठेवींचा उपयोग रोजगार व व्यवसाय निर्मिती साठी होत असल्याने नागरिकांनी आपल्या ठेवी सहकारी पतसंस्थांमध्येच ठेवाव्यात असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.