जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विधी व न्याय विभाग

कोपरगावात महालोकन्यायालयात मोठ्या संख्येने दावे निकाली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील न्यायालयात आज दि.०१ ऑगष्ट रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले होते त्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून यात पूर्व ताडजोडीसह आज २ हजार २८३ दावे निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायालयाचे सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कोपरगावात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या महा लोकन्यायालयात बँका,पतसंस्था,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,मोटार अपघात प्रकरणे,या खेरीज न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी,फौजदारी प्रकरणे ठेवली गेली होती.संबंधित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कोपरगावात लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्या.एस.एम.बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले होते त्याचे छायाचित्र.
सध्याचे ‘लोकन्यायालय’ म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रूप,जेथे कायदा जाणणाऱ्या नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय्य तडजोड घडवीते.समाजातील सांविधिक न्यायपद्धतीला पूरक,मुख्यत्वे लोकांचा सहभाग असलेली,पक्षकारांना परवडणारी,कमी खर्चाची आणि सुलभ व लवकर न्याय मिळवून देणारी न्याययंत्रणा.समाजातील सर्व लोकांना,विशेषतः दुर्बल,मागास व न्यायापासून वंचित असलेल्यांना,तिचा निश्चित चांगला फायदा होऊ शकतो.हे आज आयोजित केलेल्या लोक न्यायालयाने दाखवून दिले आहे.आज अशाच लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्या.एस.एम.बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सदर प्रसंगी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश स.बा.कोऱ्हाळकर,दिवाणी न्या.सचदेव मॅडम,न्या.डोईफोडे,न्या.शेख,यांचे सह सहा न्यायाधीशांचा गट कार्यरत होता.तर सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे,जिल्हा सरकारी वकील अशोक वहाडणे,वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,शंतनू धोर्डे,अशोक टुपके,अड.एस.एम.वाघ,अड्.मच्छीन्द्र खिलारी,अड्.नरेंद्र संचेती,अड्.योगेश खालकर,अड.व्ही.टी.सुपेकर,अड.बाबासाहेब सोनवणे,अड.बाळासाहेब कडू,अड.गुजराथी,अड.एस.के.जाधव,अड.विलास गोरे,अड.एम.एल.मोरे,आदींसह बहुसंख्य वकील व सरकारी वकील,दावेदार बँका,महावितरण,कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक अड्.जयंत जोशी यांनी केले तर सुत्रसंचलन अड्.अशोक टुपके यांनी केले आहे.तर उपस्थितांचा सत्कार जिल्हा सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी केला आहे.शेवटी उपस्थितांचे आभार अड्.शिरिषकुमार लोहकणे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close