जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभागनदी प्रदूषण

…या सिंचन प्रकल्पास देणार मोठा निधी- पवार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

ज्याप्रमाणे सात हजार कोटीच्या वैनगंगा-पैनगंगा प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.त्याप्रमाणे पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी गोदावरी खोऱ्यासह नार-पार सारख्या प्रकल्पांस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ७५ हजार कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे निवडणूकपूर्व आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथे बोलताना नुकतेच दिले आहे.

“कोपरगाव तालुक्यातील आज पर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या तुलनेत सर्वात जास्त निधी आ.आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आला आहे.मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटी निधी आणणे येऱ्या गबाळ्याचे काम नोव्हे”- अजित पवार,उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.

    कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक कोपरगाव मतदार संघाचे माजी आ.अशोक काळे यांचा अभीष्टचिंतन सोहळा व मतदार संघातील ३०० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

  

  सदर प्रसंगी सिन्नर तालुक्याचे आ.माणिक कोकाटे,आ.किशोर दराडे,माजी.आ.नरेंद्र घुले,चंद्रशेखर घुले,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,माजी खा.सुजय विखे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे,डॉ.मेघना देशमुख,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,सिद्धार्थ मुरकुटे,उदयन गडाख,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार,प्रविण पाटील,अॅड.प्रमोद जगताप,आबासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

   कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे या दोघांच्या कार्याचा गौरव करुन उपमुख्यमंत्री पवार यांनी आपण नशिबान आहोत काळे परीवारातील तीन पिढ्यांसोबत काम करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असेही त्यांनी सांगितले.


   सदर प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना माजी आ.अशोक काळे म्हणाले की,”अभीष्टचिंतन सोहळा माझ्या ध्यानीमनी नव्हता कारण मी माझा वाढदिवस कधी साजराच केला नाही.मात्र ज्याप्रमाणे अजित पवार आशुतोषचा हट्ट पूर्ण करतात त्याप्रमाणे मला देखील आशुतोषचा हट्ट मान्य करावा लागला.राजकीय जीवनात २००४ साली कोपरगाव मतदार संघातील माझ्या असंख्य जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर व असंख्य शिवसैनिक व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निवडून आलो.माझ्या राजकीय जीवनात स्वत:च्या फायद्यासाठी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही.जे काही केले,जे काही निर्णय घेतले ते समोर घेतले.बेगडी राजकारण कधीही केले नाही.जे पोटात तेच ओठात,जे आहे ते आहे,जे नाही ते नाहीच असा माझा स्वभाव.तोच स्वभाव अजित पवार यांचा असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे आणि माझे विचार जुळले आणि एकमेकांवरचा विश्वास वाढत जावून दहा वर्षात विरोधी पक्षाचा आमदार असूनही अजित पवार यांच्या सहकार्याने मतदार संघाचा विकास केला.२०१२ साली कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या निधनानंतर मोठा आधार गेल्याची भावना मनात निर्माण झाली असतांना त्यांच्या समवेत काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या काळात व आ.आशुतोष काळे यांना राजकीय व व्यक्तिगत जीवनात मोलाची दिलेली साथ आयुष्यात कधीही न विसरण्याजोगे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

   सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना आ.आशुतोष काळे  यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक,पक्षाचे पदाधिकारी कोपरगाव मतदारसंघासह जिल्ह्याभरातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव मतदार संघाच्या इतिहासात लोकप्रतिनिधी म्हणून अनेक दिग्गजांनी काम केले परंतु कोपरगाव मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून सर्व लोकप्रतिनिधींच्या तुलनेत सर्वात जास्त निधी कोणी आणला असेल तर आ.आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आला आहे.मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटी निधी आणणे येड्या गबाळ्याचे काम नाही अशा शब्दात आ.आशुतोष काळेंच्या कामाचे कौतूक केले.२०१९ च्या निवडणुकीत कमी मताधिक्य दिले परंतु यावेळी आशुतोषला लई-लई मताधिक्य द्या आपणही त्यांना मोठा निधी देऊ असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close