कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरातील रस्त्यांच्या कामाला मिळाला मुहूर्त,गुणवत्तेबाबत संभ्रम

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बंद असलेल्या व नादुरुस्त रस्त्यांना तब्बल सात महिन्यांनी मुहूर्त लाभला असला तरी शहरातील दळवळणासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या धारणगाव रस्त्यावर सिमेंट कॉंक्रिटीकरणावर डांबरीकरण करून पालिकेने कहर करून दिला असल्याने याबाबत जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ व नागरिकांनी तक्रार केली आहे.व हा रस्ता लाखो रुपये खर्चुनही पुन्हा ‘जैसे थे’ होण्यास वेळ लागणार अशी हाक दिली आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव शहरातील जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी धारणगाव रस्त्याच्या कामावर बोट ठेवले आहे.व संभाजी चौक येथे आधी असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामावर डांबरीकरण करून बांधकाम विभागाने कहर केला असल्याचा आरोप केला असून सदर रस्ता लवकरच खराब होईल असा दावा आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे.
कोपरगाव शहरातील पंचायत समितीच्या नूतन इमारत,शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उदघाटन,माजी खा.शंकरराव काळे यांच्या जन्मदिनी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उदघाटन आदींचा कार्यक्रम दि.६ एप्रिल रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता.त्यावेळी नगरपरिषदेने शहरातील धारणगाव रस्त्यांसह विविध रस्त्याचे काम सदर रस्ता काही तासात पूर्ण करण्याचे कसब दाखवले होते.मात्र त्यानंतर या कामाला तब्बल सात महिने कोणीही ढुंकूनही पहिले नाही हे विशेष ! अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही उपयोग झाला नव्हता.आता पावसाळा संपुनही काही आठवडे उलटले आहे.मात्र रखडलेल्या कामांना म्हणावा असा वेग आलेला नाही.मात्र काही निवडक रत्यांची कामे सुरु झाली आहे.
या पूर्वीही या रस्त्याच्या कामाची बोंब होती.तो कधीच पूर्ण झाला नाही.रस्त्यावरील विद्युत पोल निघता निघता सदर रस्ता पुन्हा उखडला गेला होता.यावरून विविध सर्वसाधारण सभा वारंवार गाजल्या होत्या याचा इतिहास फार जुना नाही.त्यात दुभाजक होते तेही कधी पूर्ण झाले नाही.आताही या रस्त्याची साडेसाती संपण्याची चिन्हे नाही असेच वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.
निवारा हौसिंग सोसायटीतील सप्तशृंगी मंदिरानजिक असलेला रस्ता तर अडीच वर्षा रखडला होता.त्याला कोणी दाद देत नव्हते.तेथील नगरसेवक जनार्दन कदम यांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्यांना बांधकाम विभागासह कोणी दाद दिलीं नाही.आता कुठे या रस्त्यांना मुहूर्त सापडला आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र यात काम गुणवत्तापूर्ण होत आहे याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.