आंदोलन
मराठा समाजातील पुढाऱ्यांनी आरक्षणासाठी राजीनामे द्यावेत-कोपरगावात मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा मतांवर निवडून येणारे आमदार,खासदार व तत्सम पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे द्यावे अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज सकाळी कोपरगाव येथे आयोजित निषेध सभेत केले आहे.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते उपोषणासाठी बसले होते.त्यांना काल रात्री पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला होता.तो गावकऱ्यांनी हाणून पडला होता त्यातून वादावादी होऊन आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला असून त्याचा कोपरगाव मराठा समाज संघटनेने कोपरगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त केला असून येत्या ०४ सप्टेंबर रोजी कोपरगाव बंदची हाक दिली होती त्यास कोपरगाव तालुक्यातील जनतेने पाठिंबा व्यक्त केला असून त्या निमित्त आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.


सदर प्रसंगी कोपरगावचे माजी आ.अशोक काळे,नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेनेच्या उद्धव गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,शहराध्यक्ष सनी वाघ,माजी शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,विजय आढाव,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड.संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,अनिल सोनवणे,कृष्णा आढाव,ऍड.योगेश खालकर,अनिल गायकवाड,शरद खरात आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते,पदाधिकारी,आंदोलक उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना विजय वहाडणे म्हणाले की,”राज्य सरकार दोषी असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी नाही तर राज्यातील मराठा समाजातील आमदार,खासदार यांनी राजीनामे द्यावे,यावेळी त्यांनी मराठा समाज दुबळा राहिला मात्र त्याच मराठा समाजातील नेते कोट्याधीश कसे झाले असा तिखट सवाल केला आहे.व याचा विचार मराठा समाजातील कार्यकर्ते करणार आहे का ? मराठा समाजातील मुलांना मुली का भेटत नाही.त्यांची आर्थिक अवस्था वाईट का झाली.मराठा समाजातील मतांवर मोठे झाले ते कोणत्या बिळात जाऊन लपले आहे.विविध स्थानिक संस्थांत काम करणाऱ्या मराठा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे.मराठा समाजातील नेते अण्णासाहेब पाटील यांना स्वतःवर गोळी का झाडून घ्यावी लागली याचा विचार करा.छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे असेल तर प्रथम राजीनामे द्या अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.


यावेळी माजी आ.अशोक काळे यांनी अवघ्या काही मिनिटात मराठा समाज आरक्षण आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून ते आंदोलनस्थळावरून चालते झाले असल्याचे दिसून आले आहे.तर भाजप कोल्हे गटाच्या वतीने पराग संधान यांनी या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे यांनी,”लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी आठवड्यात पाच दिवसांचे अधिवेशन ठेवण्यात आले आहे.त्यात हा मराठा समाज आरक्षणाचा ठराव मंजूर करावा अन्यथा व सर्व राजकीय नेत्यांनी राजीनामे मंजूर करावे अशी मागणी केली आहे.
सदर प्रसंगी राजेंद्र झावरे यांनी,”मराठा समाजातील नेत्यांना आंदोलनात येण्याची लाज का वाट्ते याचा आपल्या शिवराळ भाषेत समाचार घेतला आहे.व जरांगे यांना पोलिसांनी अत्याचार केला व मराठा समाजातील तरुणांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची मागणी शेवटी केली आहे.

ऍड.खालकर यांनी,”मराठा समाजातील आरक्षणासाठी विविध आयोग कसे स्थापन कसे झाले व त्यांचे विविध परस्पराविरुद्ध मते नोंदवणारे अहवाल दिले आहे.सर्वोच्च न्यायालयाने अरक्षणास विरोध केला आहे.नवीन आयोग नेमून अहवाल तयार करून आरक्षण देता येईल.मराठा आमदार हे केवळ जात लावण्यापूरते उरले आहे.मराठा समाज एकमत नसल्याने ते एकत्र आले नाही परिमाण समोर आहे.स्वाभिमानी कार्यकर्ते व्हा तर न्याय मिळेल.आपल्या जीवावर त्यांचे राजकारण आहे.या वेळी त्यांनी मराठा समाजातील नेत्यांनी निळवंडे धरणासाठी ५३ वर्ष उलटूनही काम मार्गी लावले नाही या बाबत कठोर शब्दात टीका केली आहे.

सदर प्रसंगी सेनेचे महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,शहराध्यक्ष सनी वाघ,संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे,गिरीधर पवार,जितेंद्र रणशूर,युवा भाजप कोल्हे गटाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून पाठींबा दिला आहे.
सदर प्रसंगी आपल्या मागण्यांचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.ते कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी स्वीकारले आहे.त्यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील बहुतांशी खेडी बंद ठेवण्यात आलेली आढळून आलेली आहे.मात्र कोठेही अनुचित घटना घडली नाही.