अर्थकारण
संस्थेच्या आर्थिक घटकांचे हित जोपासणे हि काळाची गरज-आ.काळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकारी संस्था चालवतांना आर्थिक शिस्त जपून संस्थेशी निगडीत असणाऱ्या घटकांचे हित जोपासणे हि काळाची गरज असून पतसंस्थेने दरवर्षी १५ टक्के लाभांश देण्याची सुरु ठेवली असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“पवार नागरी सहकारी पतसंस्थेने समर्थपणे सामना करून याहीवर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली हि अभिमानास्पद बाब आहे.कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी पतसंस्था आधारवड बनली आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डी.
पद्मविभूषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२१-२२ या वर्षाची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राधुजी कोळपे होते.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,सचिन चांदगुडे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,शंकरराव चव्हाण,सुनील मांजरे,सुभाष आभाळे, माजी संचालक ज्ञानदेव मांजरे,अरुण चंद्रे,सोमनाथ घुमरे,बाबुराव कोल्हे,सोमनाथ कांगणे, नानासाहेब चौधरी,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,कुक्कुट पालनचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी,कारखान्याचे प्रभारी.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,सचिव बाबा सय्यद आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या वेळी ते पुढे बोलताना ते म्हणाले की,”मागील दोन वर्ष आलेली कोरोनाची आव्हानात्मक परिस्थितीत व इतरही आव्हानांचा देखील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेने समर्थपणे सामना करून याहीवर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली हि अभिमानास्पद बाब आहे.कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी पतसंस्था आधारवड बनली आहे.संस्थेने संपादन केलेल्या विश्वासाच्या बळावर ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून नियमित व वेळेवर कर्ज पुरवठा करणे व त्याची नियमित कर्ज वसुली करणे,ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी मागणी प्रमाणे तत्काळ परत करीत आहे त्यामुळे संस्थेच्या ठेवीत सातत्याने वाढ होत आहे.यावरून संस्थेवर कर्जदार,ठेवीदार यांचा दृढविश्वास असल्याचे सिद्ध होत आहे.यापुढील काळातही संस्थेने असाच नियोजनबध्द कारभार करून संस्थेची आर्थिक भरभराट साधावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
दिनांक ३१मार्च अखेर संस्थेकडे ३४ कोटी ०३ लाखाच्या ठेवी होत्या यामध्ये सातत्याने वाढ सुरुच असून आज अखेर ३६ कोटीच्या ठेवी आहेत.अहवाल सालात संस्थेने २३ कोटी ३२ लाख कर्ज वाटप केलेले आहे.संस्थेची कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कर्मचारी,सभासद बंधू तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांनाच आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.९२% आहे.संस्थेचा ढोबळ एन.पी.ए. १३.३७% असून संस्थेने एन.पी.ए. तरतूद रुपये ६ कोटी ६५ लाख ५० हजारांची केली आहे. १००% एन.पी.ए.ची तरतूद केल्यामुळे निव्वळ एन.पी.ए. ० % आहे. सहकार कायद्यानुसार २२ कोटी ३९ लाखाची गुंतवणूक केली असून लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून ७३ लाख ५९ हजार रुपयांचा नफा पतसंस्था आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे सिद्ध होत असून त्याबद्दल आ. काळे यांनी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे कौतुक केले आहे.यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
सदर प्रसंगी अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक काळे बी.डी.यांनी केले.सूत्रसंचालन सुभाष बढे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सोपानराव गुडघे यांनी मानले आहे.