विशेष दिन
…या नेत्यांची जयंती संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी खा.शंकरराव काळे यांची १०४ वी जयंती कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावरील स्मृती उद्यान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

“माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या समवेत समाजकारणात सक्रीय असणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रेम मिळत असल्यामुळे आपण स्वत:ला भाग्यवान समजतो.मागील वर्षी पार पडलेली विधानसभा निवडणूक निवडणुकीप्रमाणेच लढलो.कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे ऐतिहासिक विजय मिळवून इतिहास घडला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
माजी खा.स्व.शंकरराव काळे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी या कार्याला वाहून घेत कर्मवीरांचाच वारसा पुढे चालवला.सहकाराच्या बलस्थानांचा चांगला अभ्यास करून सहकार चळवळीला त्यांनी नगर जिल्ह्य़ात एका उंचीवर नेऊन ठेवले होते त्यांची १०४ वी जयंती कोपरगाव तालुक्यात नुकतीच संपन्न झाली आहे.
याप्रसंगी माजी आ.अशोक काळे,अनिल शिंदे,स्नेहलता शिंदे,आ.आशुतोष काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,कर्मवीर काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायणराव मांजरे,ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड,पद्माकांत कुदळे,बाळासाहेब कदम,अॅड.प्रमोद जगताप,डॉ.पी.जी.गुंजाळ,संभाजी काळे, कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण सर्व संचालक मंडळ उद्योग समुह व संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,कर्मचारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक,कार्यकर्ते,रयत संकुलातील शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी खा.स्व.काळे यांच्या विषयी आपले विचार स्नेहलता शिंदे,कर्मवीर काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायण मांजरे,कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,बाळासाहेब कदम,पद्माकांत कुदळे,डॉ.पी.जी.गुंजाळ,डॉ.आय.के.सय्यद आदीनी व्यक्त केले आहे.त्यांचे विचार अतिशय प्रेरणादायी होते.ते नेहमी सांगत आपण पडलो तरी चालेल परंतु पडल्यानंतर उठता आले पाहिजे.स्व.काळे हे आज शरीराने जरी आपल्यात नसले तरी,त्यांनी शिक्षण,सहकार,कृषी,सिंचन आदी क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या,पाणी प्रश्नासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाच्या व प्रेरणादायी आठवणीच्या रूपाने ते कायम आपल्यात आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.
माजी खा.काळे यांनी शेती-सहकार,राजकारण,ग्रामीण अर्थकारण याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करताना त्यांनी राज्यात या कामाचा ठसा उमटवला.त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाने नगर जिल्ह्य़ाला प्रगतीच्या दिशेने नेण्यात महत्वाची कामगिरी बजावली असल्याचे स्मृती जागृत केल्या आहेत.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी या कार्याला वाहून घेत कर्मवीरांचाच वारसा पुढे चालवला.सहकाराच्या बलस्थानांचा चांगला अभ्यास करून सहकार चळवळीला त्यांनी नगर जिल्ह्य़ात एका उंचीवर नेऊन ठेवले.सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आधार दिला.कोपरगाव लोकसभा मतदारसंघ व पारनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना शंकरराव काळे यांनी कायम सर्वसामान्य जनतेचा विचार करून या भागाचा विकास साधला.शिक्षण व सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी या दोन्ही विभागात राज्याला दिशा देण्याचे काम केले.सहकार व शिक्षण खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द उल्लेखनीय ठरली.डेक्कन शुगर इन्स्टिटय़ूट (पुणे),तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरिज (नवी दिल्ली) या संस्थांवर ते प्रदीर्घकाळ संचालक होते.सहकारी साखर उद्योगाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.अजातशत्रू असलेले शंकरराव काळे अखेरपर्यंत कर्मयोगी राहिले.गेली सहा-सात दशके काम करताना त्यांनी जिल्हा उत्तम घडवला.सहकार व जलशिक्षणात त्यांचे योगदान मोठे आहे.रयत शिक्षण संस्थेचे कार्य मोठे करण्यात योगदान आहे.जुन्या पिढीतील एक वेगळ्या प्रकारचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.त्यांच्या जाण्याने नगर जिल्ह्य़ाचे मोठे नुकसान झाले असल्याचे मत शेवटी व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण यांनी आभार मानले आहे.त्यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.