वन व पर्यावरण
बिबट्याच्या हल्ल्यातील मुलीच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्याची भेट !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे बिबट्याच्या निर्घृण हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कु.स्नेहल राशीनकर च्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ऍड.संदीप वर्पे यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे.सदर प्रसंगी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,शिवसेनेचे मच्छिन्द्र भवर,बाबासाहेब मंडलिक,अनिल रकटे,एकनाथ राशीनकर,भाऊसाहेब साखरे,अमोल साखरे आदी उपस्थित होते.

“कोपरगाव तालुक्याला स्वतंत्र वन अधिकारी नसून स्वतंत्र अधिकारी नसल्याने बिबट्याच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत नागरिकांना वेळेत मदत नाही.बिबट्यांचा वावर कमी होत नाही.कोपरगावचा कार्यभार राहुरी येथील वनअधिकारी पाचरणे यांचेकडे सोपवला असून त्यांना सदर काम करणे अवघड आहे”- संदीप वर्पे,प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट.
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील दिघी रस्त्यावर असलेल्या दत्त मंदिरा जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मागील हप्त्यात दिनाक २६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सात वर्षीय शाळकरी मुलगी ठार झाली होती.स्नेहल संतोष राशिनकर (वय ७ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.धनगरवाडी येथे संतोष राशिनकर यांच्या वस्तीजवळ बुधवारी २६ मार्च रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने संतोष राशिनकर यांची मुलगी स्नेहल हीला घरासमोरून उचलुन शंभर फूट फरफटत नेले.त्यानंतर परिसरात आरडाओरड झाल्याने मुलीला सोडून बिबट्या अंधारात जवळील शेतात पळून गेला होता.या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या परिसरात लवकरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा अशी मागणी धनगरवाडी येथील संतप्त नागरिकांनी केली होती.
सदर प्रसंगी संदीप वर्पे यांनी कोपरगाव तालुक्याला स्वतंत्र वन अधिकारी नसल्याची बाब उजेडात आणली असून राहुरी येथील वनअधिकारी पाचरणे यांचेकडे प्रभार सोपवला असून त्यांना सदर काम करणे अवघड असल्याचे निदर्शनास आणले आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबाला तत्काळ मदत मिळायला हवी अशी मागणी केली आहे.