जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे प्रकल्पाच्या बंदिस्त वितारिकांचे काम वेगाने सुरू-माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले असून त्यांचे अस्तरिकरणाचे काम सुरू असून दुष्काळी भागातील वितरिका क्रं.०३सह (डी.वाय.०३) या बंदिस्त वितरिकांचे काम जलद सुरू असल्याचे दिसत आहे तर अन्य वितरीकांच्या कामाचे संरेखन सुरू असल्याची माहिती जलसंपदा माहितगार अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  

राज्याच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थ संकल्पात भाजप सरकारमधील राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटींची तरतूद केली असल्याची समाधानाची बाब समोर आली आहे.त्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेशबाबत कालवा कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटले आहे.दरम्यान हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला आहे.दरम्यान यात प्रारंभी पासून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील निळवंडे कालवा कृती समितीने पत्रकार नानासाहेब जवरे यांचे मार्गदर्शनाखाली न्यायीक व आंदोलनात्मक पण दुष्काळी जनतेला जागृत करण्यात महत्वाची भूमिका निभावली असल्याचे दिसून आले आहे.खा.वाकचौरे यांनी समितीला केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता मिळवून देण्यात २०१४ पूर्वी अहंम भूमिका निभावली होती.त्यामुळे पुढील ०३ मान्यता उच्च न्यायालयातून मिळविण्यात व कालवे प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून समितीचे याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,विक्रांत रूपेंद्र काले आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.महाआघाडी सरकारच्या काळात माजी खा.प्रसाद तनपुरे व तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मदतीने तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोन वर्षात कालव्याच्या कामास १०५६ कोटींचा निधी दिला होता तर भाजप सरकारने २०० कोटी तर “नाबार्डच्या केंद्रीय समितीने गत आठ महिन्यापूर्वी निळवंडे प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली होती.त्यानंतर हा नाबार्ड अंतर्गत ८०० कोटींचा निधी दिला होता.त्यामुळे निळवंडे प्रकल्पास आता निधीची चणचण भासणार नाही व कालव्यांच्या अस्तरीकरणासह नलिका वितरण व्यवस्था (पी.डी.एन.) पूर्ण होण्यास मदत असताना आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थ संकल्पात भाजप सरकारमधील राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटींची तरतूद केली असल्याची समाधानाची बाब समोर आली आहे.त्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेशबाबत कालवा कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे.

 

निळवंडेच्या पूर्वीच्या वीतरिका आणि बंदिस्त जलवाहिनी यांत पातळी जुळविण्यात काही ठिकाणी काही फरक पडत असल्याची माहिती असून त्यातून शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे.त्यात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव हद्दीत पश्चिम भागातील काही क्षेत्र वगळले जात असल्याचा तेथील कालवा कृती समितीचे कार्यकर्ते बाळासाहेब सोनवणे यांचेसह कार्यकर्त्यांचा आरोप आहे.तीच बाब सिन्नर तालुक्यातील दुशिंगपुर हद्दीत घडत असल्याचा तेथील ज्येष्ठ कार्यकर्ते रामनाथ ढमाले सर यांचा आरोप आहे.

  दरम्यान कालव्याचे अकोले तालुक्यातील अस्तरीकरणाचे (दुखण्याचे) कि.मी.०-२८ काम अंतिम टप्प्यात असल्याची बातमी आहे.ते जून २०२५ अखेर पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.परिणामी तेथील शेतकऱ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत मिळणार आहे. त्यांचे कालवा गळतीमुळे होणारे नुकसान कमी होणार आहे.मात्र जलसंपदा विभागाने अद्यापही निळवंडे कालवा कृती समितीने वारंवार प्रांत संगमनेर,तहसील अकोले,संगमनेर येथील विभागीय पोलिस अधिकारी आदींकडे लेखी मागणी करूनही अकोले तालुक्यातील कालव्यांच्या लगत दोन्ही बाजूंच्या साईड गटारीला (राजकीय श्रेयवादी नेत्यांच्या) दबावातून हात लावलेला नाही हे विशेष.या प्रकरणी त्यांनी लवकरच साईड गटारीचे काम सुरू केले नाही तर जलसंपदा विभागाच्या विरुध्द कालवा कृती समिती आंदोलन करील अथवा जलसंपदा विभागाला उच्च न्यायालयात खेचील असा गंभीर इशारा कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी दिला आहे.

  

दरम्यान निळवंडे लाभक्षेत्रातील दुष्काळी गावांच्या ओढ्यांचे किंवा नद्यांचे उगम निळवंडे कालव्याच्या खाली आहे.त्या गावातील पाझर तलाव अद्याप तीन वर्षात भरून मिळालेले नाही.त्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहे.त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाने प्राधान्याने तेथील प्रमुख चाऱ्यांचे काम प्राधाण्यक्रमाने पूर्ण करून तेथील पाझरतलाव व के.टी.वेअर आधी भरून दयावे अशी मागणी पुढे आली आहे.

  दरम्यान आता बंदिस्त वितरण व्यवस्था अडीच वर्षात पूर्ण करणे गरजेचे बनले आहे.त्यासाठी जलसंपदा विभागाने मध्यप्रदेश मधील मोहनपुरा,तेलंगणा येथील बंदिस्त प्रकल्प पथदर्शी ठेवून बंदिस्त वितरिकांचे काम सूरू केले आहे.त्याचा जवळपास ८०० कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून सदर काम मोहनपुरा येथील प्रकल्पाचे काम पूर्ण केलेल्या इंदोर येथील ‘फलोदी कन्स्ट्रक्शन’ने निविदा जिंकली आहे.पूर्वीच्या वीतरिका आणि बंदिस्त जलवाहिनी यांत काही ठिकाणी काही अंशी अंतर पडत असल्याची माहिती असून त्यातून शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे.त्यात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव हद्दीत पश्चिम भागातील काही क्षेत्र वगळले जात असल्याचा तेथील कालवा कृती समितीचे कार्यकर्ते बाळासाहेब सोनवणे यांचेसह कार्यकर्त्यांचा आरोप आहे.तीच बाब सिन्नर तालुक्यातील दुशिंगपुर हद्दीत घडत असल्याचा तेथील ज्येष्ठ कार्यकर्ते रामनाथ ढमाले सर यांचा आरोप आहे.
  दरम्यान वितरीका क्रं.०३(डी.वाय.०३) चे काम वेगाने सुरू केले आहे.या वितरिकेखाली जवळपास ०४ हजार ६०० हेक्टर सिंचनाखाली येणार आहे.याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला असून सदर प्रश्नी अधिकारी आणि संबधित कंपनी यांचे प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे.

  याशिवाय अकोले तालुक्यातील १७०० हेक्टर,डी.वाय.०२ मधील (तळेगाव दिघे ब्रंच) मधील ११ हजार ५०० हेक्टर संकल्पन सी.डी.ओ.मेरी नाशिक यांचेकडून अंतिम टप्प्यात आले आहे.सादतपूर येथील वितारिकेखाली १६०० हे.संकल्पन,मोरवाडी वितरिकेखाली २२२ हे.क्षेत्र अंतिम टप्प्यात आले आहे.या शिवाय कि.मी.४७-५८ मधील ०४ हजार ३०० हेक्टर अंतिम टप्प्यात आले आहे.निमगाव जाळी वितारिका खाली ३,५०० हेक्टर आरेखन क्षेत्र अंतिम टप्प्यात आले आहे.दरम्यान उजव्या कालव्याखाली राहुरीच्या दिशेने असलेले ०४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र संरेखन अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

   दरम्यान पूर्वीच्या वीतरिका आणि बंदिस्त जलवाहिनी यांत काही ठिकाणी काही अंशी अंतर पडत असल्याची माहिती असून त्यातून शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे.त्यात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव हद्दीत पश्चिम भागातील काही क्षेत्र वगळले जात असल्याचा तेथील कालवा कृती समितीचे कार्यकर्ते बाळासाहेब सोनवणे यांचेसह कार्यकर्त्यांचा आरोप आहे.तीच बाब सिन्नर तालुक्यातील दुशिंगपुर हद्दीत घडत असल्याचा तेथील ज्येष्ठ कार्यकर्ते रामनाथ ढमाले सर यांचा आरोप आहे.

   दरम्यान निळवंडे लाभक्षेत्रातील दुष्काळी गावांच्या ओढ्यांचे किंवा नद्यांचे उगम निळवंडे कालव्याच्या खाली आहे.त्या गावातील पाझर तलाव अद्याप तीन वर्षात भरून मिळालेले नाही.त्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहे.त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाने प्राधान्याने तेथील प्रमुख चाऱ्यांचे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करून तेथील पाझरतलाव व के.टी.वेअर आधी भरून दयावे अशी मागणी कोऱ्हाळे ज्येष्ठ कार्यकर्ते सोमनाथ दरंदले,वाळकी येथील नवनाथ शिरोळे,युनुसभाई शेख,दगुभाई शेख,जवळके सरपंच सारिका विजय थोरात,बहादरपुर येथील कार्यकर्ते गंगाधर रहाणे व सरपंच गोपीनाथ रहाणे,साहेबराव रहाणे,नरहरी पाचोरे,माजी सरपंच विक्रम पाचोरे,गणपतराव पोचोरे,वाल्मीक नेहे,नानासाहेब नेहे,ज्ञानेश्र्वर नेहे,सायाळे येथील शिंदे गुरुजी,तानाजी शिंदे आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close