जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

कृषी यांत्रिकीकरण योजनेत…हा तालुका जिल्ह्यात प्रथम-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नातून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती देवून कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी तालुका कृषी विभागाचे अभिनंदन केले आहे.

“शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे वळणे भाग पडले आहे.परंतु शेतमालाला खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे त्यांना सातत्याने अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे.वाढलेले कृषी औजारांचे दर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही त्यामुळे गरजू शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे कृषी यांत्रिकीकरण योजना फायदेशीर आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

राज्य कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना आ. काळे यांच्या हस्ते ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,नंदकुमार औताडे,प्रभाकर गुंजाळ,विठ्ठल जावळे,गणेश बारहाते,राजेंद्र औताडे,बाळासाहेब औताडे,भाऊसाहेब औताडे,बाजीराव होन,दत्तात्रय गांगवे,भारत रानोडे,नितीन पगार आदींसह लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की,दिवसेंदिवस मजुरांची कमी होत असलेले संख्याबळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे कृषी यांत्रिकीकरणाला शेतकरी प्राधान्य देत असून आजची ती गरज झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे वळणे भाग पडले आहे. परंतु शेतमालाला खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे त्यांना सातत्याने अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे.वाढलेले कृषी औजारांचे दर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही त्यामुळे गरजू शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे कृषी यांत्रिकीकरण योजना फायदेशीर आहे.परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या व मिळणारे अनुदान यामध्ये मोठी तफावत आहे.हि तफावत दूर करून कृषी औजारे मिळण्यासाठी अर्ज केलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाने जबाबदारीने भूमिका पार पाडली आहे.त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून सुमारे ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारे शेतकऱ्यांना मिळाली असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close