आंदोलन
मराठा आरक्षणसाठी कोपरगावात पुन्हा एकदा एल्गार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोपरगाव शहरात पुन्हा एकदा शुक्रवार दि.०१ डिसेंबर रोजी,’साखळी उपोषण’ सुरु होत असून त्यासाठी आगामी काळात त्याच्या तिव्रतेबाबत वळोवेळी कळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून त्यासाठी मनोज जरांगे आदींनी राज्यात मोठा संघर्ष उभा केला असून त्यासाठी त्यांनी मराठा समाजात मोठी जागृती घडवली आहे.मात्र अद्याप हि राज्य सरकार झोपेतून जागे व्हायला तयार नाही.त्यामुळे हा असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.आता कोपारगावत मराठा तरुणांनीं साखळी उपोषण सुरु करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून त्यासाठी मनोज जरांगे आदींनी राज्यात मोठा संघर्ष उभा केला आहे.त्यासाठी त्यांनी मराठा समाजात मोठी जागृती घडवली आहे.मात्र अद्याप हि राज्य सरकार झोपेतून जागे व्हायला तयार नाही.त्यामुळे हा असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आगीत तेल ओतले असल्याचे मानले जात असून मराठा व इतर मागास वर्गीय यांच्यात वाद होतो की काय अशी शंका राज्यातील जनतेत उपस्थित होत आहे.त्यासाठी गावोगाव पुन्हा एकदा,’साखळी उपोषण’ सुरु करण्याचा निर्धार मराठा तरुणांनी व्यक्त केला असून त्यासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.त्यासाठी आज सकाळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन दिले आहे.
सदर प्रसंगी युवा राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,विनय भगत,रवींद्र नरोडे,विजय जाधव,मनोज नरोडे,प्रशांत वाबळे,दिनेश गाडेकर,शैलेश साबळे,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,अमित आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रति कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींना दिले आहे.