जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

‘त्या’रस्त्याच्या कामाची चौकशी करा-कोपरगावात मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या तळेगाव मार्गे कोपरगाव संगमनेर रस्त्यावर गत महिन्यात जवळपास १० कोटी रुपयांचा खर्च करून सदर रस्ता तयार करण्यात आला असताना हा रस्ता अवघ्या काही आठवड्यात पुन्हा,’होत्याचा नव्हता’ झाला आहे.त्यामुळे या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी अड्.योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना केली आहे.

“झगडेफाटा ते जवळके या १० कि.मी.रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद होऊन सदरचा रस्ता सुरु करण्यात आला होता.मात्र काही दिवसात सदरचा रस्ता त्यात डांबर न वापरल्याने काही दिवसात होत्याचा नव्हता झाला आहे.त्यामुळे ग्रामस्थानीं मोठी नाराजी व्यक्त केली आहे.सन-२०१७ च्या नवीन शासन धोरणानुसार डांबरीकरण रस्त्याची पंधरा तर काँक्रिटीकरण रस्त्याच्या मजबुतीची हमी संबधित ठेकेदारांची निश्चित करण्यात आलेली आहे त्यानुसार हि चौकशी करणे गरजेचे बनले आहे”-अड्.योगेश खालकर,रांजणगाव देशमुख.

उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या तळेगाव मार्गे कोपरगाव संगमनेर रस्त्यावर गत महिन्यात जवळपास १० कोटी रुपयांचा खर्च करून सदर रस्ता तयार करण्यात आला होता.मात्र सदर रस्ता अवघ्या दिवसात पुन्हा,’जैसे थे’ झाला आहे.त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता किती निकृष्ट आहे हे उघड झाल्याने जवळके,बहादरपूर,वेस-सोयगाव,रांजणगाव देशमुख,तळेगाव दिघे आणि परिसरातील नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.व या रस्त्याची व त्यावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी जवळके आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हा रस्ता होण्याच्या आधी पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत गणेश मंदिराजवळ व पोहेगाव येथील माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांची वस्ती,बहादराबाद,शहापूर,जवळके,धोंडेवाडी,रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी अवजड वहाने अपघात ग्रस्त होऊन अनेकांना आपले जीवित व वित्तीय हानी सोसावी लागली आहे.दैनंदिन वापरासाठी या नजीकचे ग्रामस्थ या रस्त्यामुळे बेजार झाले होते.त्याना आपला शेतीमाल अन्यत्र नेणे हि मोठी शिक्षा ठरत आहे.मात्र ‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीनुसार दहा कोटी रुपयांची तरतूद होऊन सदरचा रस्ता सुरु करण्यात आला होता.मात्र काही दिवसात सदरचा रस्ता त्यात डांबर न वापरल्याने काही दिवसात होत्याचा नव्हता झाला आहे.त्यामुळे ग्रामस्थानीं मोठी नाराजी व्यक्त केली आहे.सन-२०१७ च्या नवीन शासन धोरणानुसार डांबरीकरण रस्त्याची पंधरा तर काँक्रिटीकरण रस्त्याची जबाबदारी संबधित ठेकेदारांची निश्चित करण्यात आलेली आहे त्यानुसार हि चौकशी करणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान याबाबत रांजणगाव देशमुख येथील कार्यकर्ते अड्.योगेश खालकर यांनी बांधकाम विभागास एक लेखी निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”सदरच्या रस्त्याचे काम मजबुत होणे गरजेचे असताना त्याच्या गुणवत्तेत तडजोड केली आहे.त्यामुळे त्यात डांबर वापरले की नाही हा प्रश्न तयार झाला आहे.त्यामुळे पुढे रस्ता सुरु असताना तो मागे होत्याचा नव्हता झाला आहे.त्यामुळे या भागातील जनतेच्या भाळी पुन्हा एकदा अपघातांची मालिका लिहिलेली असल्याचे दिसून येत आहे.

याआधीच आशियायी विकास बँकेने या रस्त्यासाठी राज्याचा ३० टक्के हिस्सा व या बँकेचा ७० टक्के निधी देण्याच्या बोलीवर तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते वडगाव पान फाटा या ३० कि.मी.रस्त्यासाठी सुमारे १८९ कोटी रुपयांचा निधी सन-२०१८ साली प्रस्तावित केला होता.सदर मंजुरीत कायम खराब होणारा सखल भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व अनेक ओढे,नाले,आणि रस्त्यावर मोठे पूल,प्रत्येक गावात चार पदरी रुंद रस्ता आदीं कामांचा समावेश होता.सदर रस्त्याची रुंदी सिन्नर शिर्डी रस्त्याच्या रुंदी इतकी ऐसपैस होती.त्यामुळे गर्दीच्या ठीकाणी अपघात कमी होण्यास मदत मिळणार होती.मात्र त्याची तीस टक्के निधीची राज्य सरकारची निधीची तयारी असल्याचे दिसले नाही व त्यासाठी स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केला नाही.त्यामुळे सदरचा निधी हे दिवास्वप्न ठरले होते.आता केवळ दहा कोटींची बोळवण करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप करून त्यांनी सदर रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अड्.योगेश खालकर यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close