धार्मिक
शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ०४ ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली आहे.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले.यामध्ये गहु,तांदुळ व बाजरी असे सुमारे १५० पोते धान्यरुपाने आणि गुळ,साखर व गहु आटा आदींव्दारे ०३ लाख ६० हजार २७९ रुपये व रोख स्वरुपात रुपये ६१ हजार ५५४ रुपये अशी एकूण ०४ लाख २१ हजार ८३३ रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली आहे.
आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरती,त्यानंतर पहाटे ०५.४५ वाजता श्रींचे मंगल स्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली.सकाळी ०७.०० वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नाशिक यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली.तर समाधी मंदिरात प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.किरण जोरी यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली आहे.
सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.अंजली श्रीकृष्ण जोशी यांचे गोपाळ काल्याचे कीर्तन झाले.काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत,प्राप्तिकर विभाग नाशिक सहआयुक्त संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी,कर्मचारी,साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली.सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते ०९.४५ यावेळेत सुप्रसिध्द गायिका गोविंद सखराम देशपांडे यांचा सुगम संगीत हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला.या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली आहे.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले.यामध्ये गहु,तांदुळ व बाजरी असे सुमारे १५० पोते धान्यरुपाने आणि गुळ,साखर व गहु आटा आदींव्दारे ०३ लाख ६० हजार २७९ रुपये व रोख स्वरुपात रुपये ६१ हजार ५५४ रुपये अशी एकूण ०४ लाख २१ हजार ८३३ रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली आहे.तर उत्सवकाळात सुमारे ०२ लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर ०१ लाख ९५ हजार २४२ लाडू प्रसाद पाकीटांचा साईभक्तांनी लाभ घेतला. याबरोबरच श्री साईप्रसादालयात सुमारे ०१ लाख ६० हजार साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा व अल्पोहार म्हणून ४३ हजार ६७५ अन्नपाकीटांचा साईभक्तांनी लाभ घेतलेला आहे.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा,सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय अधिकारी,संरक्षण अधिकारी,सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.