जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

पंढरीच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी…अशीही बँक…!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   पंढरपूरच्या वारीकडे जाणाऱ्या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था पुढे आली असून,‘समता सहकारी वारकरी बँक’ या अभिनव संकल्पनेद्वारे वारकऱ्यांच्या पैशांची आणि इतर आवश्यक वस्तूंची जबाबदारी संस्थेने स्वेच्छेने घेतली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी पांडुरंगाच्या वारकरी दिंडीत सहभागी होत समता च्या समता सहकारी वारकरी बँकेला शुभेच्छा दिल्या.प्रसंगी समताचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे आणि वारीतील वारकरी दिसत आहेत.

   पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पवित्र यात्रा आहे.लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी पायी चालत ही यात्रा करतात.विठुनामाचा गजर करत अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने मैलमैल चालत असतात.वारीला निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाला पाहण्याची ओढ लागलेली असते. वारीचा हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी अनेक वारकरी वारीत सहभागी होत असतात.पंढरीच्या या वारीत पांडुरंगाची सेवा म्हणून वारकऱ्यांची सेवा करणारे अनेक लोक असतात.दिंडीतील सेवेकरी,आरोग्य कर्मचारी,पोलिस आणि स्थानिक नागरिक समाविष्ट असतात.वारीमध्ये वारकऱ्यांसाठी निवास,भोजन,आरोग्य सुविधा आणि सुरक्षा पुरवण्याची व्यवस्था केली जाते.तर काही समाजसेवी संस्था या वारकऱ्यांचे हात-पाय चेपून सेवा करणारे कमी नाहीत.मात्र यात एकच कमी होती.वारकऱ्यांचा च्या सामानाची आणि पैशा अडक्याची जबाबदारी घेण्याची सेवा कोणी पार पाडत नव्हते.त्याबाबत प.पू.विष्णू महाराज केंद्रे यांनी नुकतीच खंत व्यक्त करून वारकऱ्यांच्या वस्तू व पैशांची जबाबदारी कोणीतरी घ्यावी,असे आवाहन नुकतेच केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधील समता पतसंस्थेने पंढरपूरच्या मार्गावर वारकऱ्यांना अत्यावश्यक वेळेस त्यांच्या जमा केलेल्या वस्तू आणि रक्कम दिली जाईल,अशी सुविधा सुरू केली आहे.

  

वारीतील वारकऱ्यांना ऊन,पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेनकोट वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

  या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे,या सेवेसाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.उलट,एक दिवस जरी पैसे जमा राहिले,तरी ८% व्याजासह ती रक्कम परत दिली जाते,अशी माहिती समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.या उपक्रमाचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले आहे.

   याचबरोबर,वारकऱ्यांना ऊन,पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेनकोट वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब,कार्याध्यक्ष सुधीर डागा आणि उपाध्यक्ष चांगदेव शिरोडे यांनी दिली.या उपक्रमामुळे वारकऱ्यांना प्रवासात बसण्याची आणि हवामानाचा त्रास टाळण्याची मोठी मदत झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘समता सहकारी वारकरी बँक’ उपक्रम आळंदीपासून पंढरपूरपर्यंत अखंड सुरु असून,दिंडी क्रमांक ४३ मध्ये सहभागी असलेल्या विष्णू महाराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.या अभिनव सामाजिक उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुरक्षिततेचा विश्वास दिसून येत आहे.

  पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेच्या समता पतसंस्थेच्या अशा अभिनव उपक्रमाबद्दल वारकऱ्यांच्या वतीने वारकरी संप्रदायातील आदर्श व्यक्तीमत्त्व बाबासाहेब कापे यांनी समता पतसंस्था,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांचे आभार मानले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close