जाहिरात-9423439946
कृषी विभाग

अति पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करा-सूचना

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे एका डोळ्यात हसू व दुसऱ्या डोळ्यात आसू अशी शेतकऱ्याची दूरावस्था झाली असून दर दिवसाच्या पावसाने जमिनी उफाळलेल्या आणि आत्ता तर अत्यंत चांगले आलेल्या खरीप पिकांच्या शेतात पाणी साचल्याने नुकसान होत आहे.त्यामुळे नुकसान ग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना आ.लहू कानडे यांनी तालुका प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

जाफ्राबाद -नायगाव पाझर तलाव काठोकाठ भरल्याने ज्या जमिनी अधिग्रहीत केलेल्या नव्हत्या अशा शेकडो एकर क्षेत्रामध्ये पाणी साठल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याही नुकसानीच्या पंचनामे करा-आ.कानडे

वर्तमानात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे.या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावामध्ये शेती मध्ये पाणी साचल्याने पिके सडून जाण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.हातातोडाशी आलेले स्वायाबीन,कपाशी,भुईमुग,कांद्याची रोपे बाजरी सारखे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

या पार्श्वभूमीवर आ. लहू कानडे यांनी बुधवारी प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांना प्रत्यक्ष गावोगाव भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे.तसेच जेथे आधिक नुकसान झाले.तेथे शेती पिकाचे पंचनामे करण्याचे सांगितले होते.जाफ्राबाद -नायगाव पाझर तलाव काठोकाठ भरल्याने ज्या जमिनी अधिग्रहीत केलेल्या नव्हत्या अशा शेकडो एकर क्षेत्रामध्ये पाणी साठल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याही नुकसानीच्या पंचनामे करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या होत्या.त्यानुसार महसुल विभागाने लेखी आदेश काढून सर्व तलाठ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे.

सदर चे पंचनामे वादळी वारे व अतिवृष्ठी नुकसान झालेल्या गावामध्ये सबंधित गावचे तलाठी,ग्रामसेवक,कृषीसहाय्यक यांनी संयुक्तपणे बाधित पिकांचा पंचनामा व बाधित शेतकऱ्यांची यादी संयुक्त स्वाक्षरीने तहसीलदाराकडे पाठवायाची आहे.यासाठी आ. कानडे यांनी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close